चंद्रकांत पाटील म्हणाले की ,” कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? Chief Minister Uddhav Thackeray got 5th place among the top chief ministers of the country, Chandrakant Patil gave a response
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने एक सर्व्हे केला आहे.दरम्यान सर्व्हेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पाचवे स्थान मिळालं आहे.दरम्यान हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की ,” कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत.ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत.”
पुढे पाटील म्हणले की , पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री आजारपणाच कारण सांगूनउपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र म्हणजे फक्त आणि फक्त मुंबई आहे. मग मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Chief Minister Uddhav Thackeray got 5th place among the top chief ministers of the country, Chandrakant Patil gave a response
महत्त्वाच्या बातम्या
- तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता? कंगना रनौटविरुध्द याचिका करणाऱ्या वकीलाला सर्वोच्च न्यायालयानेच सुनावले
- कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न
- विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
- 2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास होणार बनारस हिंदू विद्यापीठाचा उपक्रम
- रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ