विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची माहिती मिळवण्यास गेल्यास बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी दिली. Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded
कोरोनामुळे शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. महागाईचा परिणाम बियाणे व खतांवर देखील झाला आहे. त्यांचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाने बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करावे, असे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी सांगितले.
- राज्यात महागाईने उच्चांक गाठला
- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी
- बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करा
- रयत शेतकरी संघटनेची मागणी
- कोरोनामुळे शेतकरी डबघाईला आला
Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल