• Download App
    पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची नरेंद्र मोदींनाच पसंती; बावनकुळेंच्या महाविजय संकल्प यात्रेत आले दिसून The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule

    पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची नरेंद्र मोदींनाच पसंती; बावनकुळेंच्या महाविजय संकल्प यात्रेत आले दिसून

    लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा बावनकुळेंनी व्यक्त  केला विश्वास.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय २०२४ संकल्प यात्रेच्या’ निमित्तानं आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. या प्रवासात त्यांनी ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला आणि पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी  यांना पसंती दिली आणि केवळ १३ लोकांनी इतर पक्षातील नेत्यांना पसंती दिली. त्यातील फक्त चौघे राहुल गांधी समर्थक होते. The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule

    याबाबत बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे माहिती देताना सांगितले की, गेल्या साडेनऊ वर्षांत नरेंद्र मोदींनी केलेला विकास, जगभरात उंचावलेली भारताची मान, आत्मनिर्भर भारतासाठी केलेला संकल्प यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोदींच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेच्या याच प्रेमाच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील हा ठाम विश्वास आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’, हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र भाजपा कटिबद्ध आहे.

    दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यांत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ – वाशीम, अकोला, बुलडाणा, अमरावती, रामटेक, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक ,बारामती, मावळ,शिरूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले, ठाणे, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात प्रवास करून जनतेशी थेट संवाद साधला आहे.

    The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे

    Ajit Pawar : दोन्ही पवार एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले- आमचे विचार वेगवेगळे, पण कुटुंब म्हणून सोबत असतो