• Download App
    राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान । State Government will last seven and half days only : Narayan Rane

    राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता उद्धव ठाकरे त्यांच्यात नाही. राज्य सरकार साडेसात दिवसच टिकेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. State Government will last seven and half days only : Narayan Rane

    बुलडाण्यामध्ये मागील आठवड्यातील मोर्चामध्ये भाजपच्या नेत्याने तथा माजी जिल्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेला हिजड्यांची फौज, असे संबोधले होते. त्याबाबत नारायण राणे यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी त्या शब्दांच समर्थन करणार नाही. पण ते अनेक सैनिकांचं मत आहे. त्यामुळे आता सगळेजण येणाऱ्या दोन वर्षात भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि सगळ्यांना तपासून भाजपामध्ये प्रवेश देऊ.

    ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता ठाकरे यांच्यात नाही,तसेच यावेळी राज्यातील सरकार किती दिवस टिकेल ? या प्रश्नावर ते म्हणाले, तर साडेसात दिवस. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना चिखली येथे उत्तरे दिली आहेत.

    • राज्य सरकार सात दिवसच राहणार
    • पत्रकारांनी विचारले किती दिवस सरकार टिकणार
    • मुख्यमंत्र्यांनी गुणवत्ता उद्धव ठाकरेंमध्ये नाही
    • शिवसैनिकांना हिजड्यांची फौज संबोधणे, याचे समर्थन नाही करणार नाही
    • शिवसैनिक भाजपमध्ये लवकरच येतील

    State Government will last seven and half days only : Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती