• Download App
    Sharad Pawar शरद पवारांनी सांगितले वारंवार मुंबईतील

    Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितले वारंवार मुंबईतील रेल्वे अपघाताचे कारण; म्हणाले- खापर फोडून चालणार नाही

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sharad Pawar  मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकां जवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अपघातामागचे कारण आणि त्यावरील उपाय योजना देखील त्यांनी सुचवल्या आहेत.Sharad Pawar

    या संदर्भात शरद पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत जखमी साठी प्रार्थना देखील केली आहे. यात त्यांनी लोकल ट्रेन्स मधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने करायला हव्यात अशा उपाययोजना देखील सुचवल्या आहेत.



    शरद पवारांची पोस्ट…

    मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

    मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.

    केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

    Sharad Pawar repeatedly mentioned the reason for the Mumbai train accident; said – It won’t work by breaking the rules

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis Announces : सर्व लोकल एसी होणार– भाडेवाढ नाही! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

    Zeeshan Akhtar : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी झीशान अख्तर कॅनडामध्ये ताब्यात

    Toll Policy : आता एक्सप्रेस वेवर जेवढी चालेल गाडी, तेवढाच आकारला जाणार टोल?