• Download App
    शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राज्यातील सर्वात मोठे नेतृत्व : संजय राऊत । 'Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan' - Sanjay Raut

    शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राज्यातील सर्वात मोठे नेतृत्व – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan’ – Sanjay Raut

    शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संजय राऊत यांनीही शरद पवारांना वाढविसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यावेळी ते बोलत होते.



    संजय राऊत म्हणाले, ८१ वर्षांनंतरही शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील, असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, असं राऊत म्हणाले.

    ‘गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती’

    आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं ते म्हणाले.

    ‘Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan’ – Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ