• Download App
    दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीला वरून संजय राऊत यांनी लगावला टोला | Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

    दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीला वरून संजय राऊत यांनी लगावला टोला

     विशेष प्रतिनिधी

    मुबंई : संजय राऊत यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील लवकरच सुटेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. कारण शरद पवार यांनी बरेच सकारात्मक मुद्दे बैठकीमध्ये मांडले आहेत, तसेच त्यांनी अनिल परब आणि अजित पवार यांच्याशी देखील अतिशय सकारात्मकदृष्टय़ा चर्चा केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

    Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

    नुकताच चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान केले होते की, गुढीपाडव्यापर्यंत राज्यात नवीन सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाणार. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत 28 वेळा असे विधान केले आहे. आणि ते भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असल्याकारणाने त्यांना असे बोलणे भाग आहे. त्यांच्या बोलण्याने सरकार जात नाही, हे सर्वांना माहीत आहे. हे सरकार पुढचे 25 वर्ष टिकणार आहे. म्हणून सरकार पडेल असे चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर त्यांना मी एवढेच सांगेन की, झोपेतून जागे व्हा.


    Sanjay Raut : शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत ; नेमकी चर्चा कशावर ?


    पुढे संजय राऊत हे म्हणतात की, पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होत आहेत. म्हणूनच बहुतेक चंद्रकांत पाटील यांना असे झटके येत असावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि लवकरच ते कामावर रुजू होतील असे त्यांनी सांगितले आहे.

    Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील