प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे भाषण महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून गेले आहे. तब्बल दोन वर्षांनी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात बोलले त्यानंतर त्यांना हिणवणाऱ्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.Raj Thackeray: Raj Thackeray’s speech insulted those who betrayed Hindutva; Narayan Rane’s team
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्तुती केली आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांचे भाषण कोणाला टोचले आणि का टोचले याची थोडक्यात आणि अशोक मीमांसा केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणतात :
- पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.
- ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे.
- गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
Raj Thackeray: Raj Thackeray’s speech insulted those who betrayed Hindutva; Narayan Rane’s team
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानमधील करौली येथे जातीय दंगल हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर दगडफेक
- दिल्लीत पुन्हा एकदा दारूच्या किमती कमी होणार
- एलजीबीटी समुदायाला विवाहाचे समान अधिकार द्यावेत सुप्रिया सुळेंचे खाजगी विधेयक लोकसभेत सादर
- Russia India Talk : रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत पीएम मोदींकडून तत्काळ युद्धबंदीचा पुनरुच्चार, रशियन मंत्री म्हणाले- भारत करू शकतो मध्यस्थता!
- नाशिक मध्ये महा ढोलवादन, महारांगोळी, अंतर्नाद पुन्हा होणार; नववर्ष स्वागत समितीची कार्यक्रमांच्या नव्या तारखा जाहीर!!