• Download App
    पुणे : ओमायक्रॉनच्या एन्ट्रीमुळे महापालिका खडबडून जागी , राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले । Pune : State Government and Municipal Corporation set up a Jumbo Covid Hospital with a capacity of 800 seats

    पुणे : ओमायक्रॉनच्या एन्ट्रीमुळे महापालिका खडबडून जागी , राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले

    ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. Pune: State Government and Municipal Corporation set up a Jumbo Covid Hospital with a capacity of 800 seats


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : जगातील १२ देशांमध्ये वाढलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. पुण्यात देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता परंतु त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान झपाट्याने संसर्गित होणाऱ्या करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे.

    ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण सापडण्याआधीच पुणे पालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आवारातील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली.



    महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती आणि अन्य विभाग प्रमुखांनी ही भेट दिली.दरम्यान या रुग्णालयातील सर्व साहित्य आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन ‘रेडी पोझिशन’ मध्ये ठेवण्याच्या संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

    करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले. या रुग्णालयात यावर्षी जुलैपर्यंत साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

    Pune : State Government and Municipal Corporation set up a Jumbo Covid Hospital with a capacity of 800 seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील