• Download App
    Manoj Jarange Patil Criticizes Roundtable Conference मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manoj Jarange  मराठा समाज संपूर्ण देशात‎ विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच ‎करोडो समाजबांधवांना घेऊन ‎दिल्लीला जाणार असल्याचे मनोज‎‎ जरांगे पाटील यांनी‎‎ सांगितले. गुरुवारी‎‎ते आंतरवाली‎‎ सराटी येथे‎‎ माध्यमांशी बोलत‎‎ होते. हैदराबाद‎‎ गॅझेट विरोधातील‎‎ याचिका‎ फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे‎ आभार मानले. न्यायदेवता‎ गोरगरिबांसाठी काम करते. देशात‎ लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे‎ यावेळी म्हणाले.‎Manoj Jarange

    याप्रसंगी मनोज जरांगे पाटील‎ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‎‎शरसंधान साधले. येवल्याचा ‎‎अलिबाबा दोन आरक्षण खात आहे. ‎‎त्यामुळे १६ टक्के आरक्षणाची‎ श्वेतपत्रिका काढायला लावणार ‎आहे, असे जरांगे म्हणाले. भुजबळ‎ लोकांची भाजी चोरून आणून‎ विकत होते. त्यांना आता लवकरच‎ तुरुंगात जावे लागेल, असे जरांगे‎ म्हणाले.‎Manoj Jarange



    बंजारा समाजाच्या उपोषणाला‎ मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली‎ नाही. त्यावर जरांगे यांनी टीका‎ केली. त्यांच्या समस्येकडे लक्ष न‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देणे कितपत योग्य आहे, असा‎ सवाल जरांगे यांनी केला. दरम्यान,‎ सरकारमधील काही लोकप्रतिनिधी‎ जातीवाद करीत आहेत. ते जर‎ सरकारमध्ये राहून जातीचे काम‎ करत असतील, तर आमच्या‎ नेत्यांनीही जातीचे काम करायला‎ काय हरकत आहे. लवकरच‎ आम्ही सर्वपक्षीय मराठा नेत्यांची‎ बैठक घेऊ, असेही मनोज जरांगे‎ पाटील यांनी सांगितले.‎

    गोलमेज परिषदेवर टीका‎

    कुणी काय करावे आणि काय करू‎ नये हे आजकाल अवघड झाले‎ आहे. ज्यांना जे करायचे आहे ते करू‎ द्या. जेव्हा वेळ होती तेव्हा ते आले‎ नाहीत. वेळ गेल्यावर असे काही‎ उकरून काढायचे, त्यावर मी काही‎ बोलणार नाही. काहींचे दुकाने बंद‎ पडत आहेत. काही, माना-पानाला‎ भुकेलेले आहेत. काही तरी पिल्लू‎ उकरून काढायचे आणि स्वत:ला ‎खूप हुशार समजायचे. मग तेव्हा का‎ आले नाहीत, अशा शब्दात जरांगे‎ पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे‎ गुरुवारी झालेल्या गोलमेज परिषदेवर‎ टीका केली. समाजातील गरीब‎ मराठ्यांना वर कसे नेता येईल याकडे‎ आम्ही लक्ष देण्याचे ठरवले आहे.‎ समाज उघड्या डोळ्याने सगळे‎ बघत आहे, असे जरांगे यावेळी‎ म्हणाले.‎

    Manoj Jarange Patil Criticizes Roundtable Conference

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lakshman Hake : मनोज जरांगे यांनी दिल्ली नाही,‎ तर अमेरिकेत गेले पाहिजे‎; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!