वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई व पुण्यासह राज्यातील कोरोना, ओमीक्रोनाचा संसर्ग दर चिंताजनक आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले. परंतु, नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. Infection rates in the state are worrisome: Rajesh Tope; Fear not, appeal to care
दरम्यान, राज्यातील शहरांपाठोपाठ अन्य जिल्ह्यांमध्येही तिसरी लाट पसरत आहे. मुंबईत तिसऱ्या लाटेचा प्रभाव जानेवारीच्या अखेरीस कमी होण्यास सुरुवात होईल. परंतु राज्यात मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिसरी लाट उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यभरात खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत़, असे कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.