वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी आज सायंकाळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने नबाब मलिकांनी सरकार टिकण्याचा दावा केला. Govt will complete 5 yrs, we’re together as MVA & ‘Operation Lotus’ can’t succeed: Maharashtra Min Nawab Malik on Devendra Fadnavis’statement that BJP will form govt later,if not during COVID
महाराष्ट्रात सरकार बदलाचा विषय कोरोना गेल्यानंतर हातात घेऊ, असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते विधान मलिक यांनी फेटाळून लावले. महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ यशस्वी होणार नसल्याचा दावा मलिक यांनी केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदार फुटणार नाहीत. उलट भाजपचेच आमदार फुटू नयेत यासाठी फडणवीस तशी विधाने करीत असल्याचा दावा मलिकांनी केला.
आज बऱ्याच दिवसांनंतर शरद पवार राष्ट्रवादीत ऍक्टीव झालेले दिसले. कालच देवेंद्र फडणवीसांनी त्यांची सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेच पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि अन्य नेत्यांची बैठक घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण ही बैठक फक्त मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी झाल्याचा दावा मलिक यांनी केला.
सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्या वडिलांशी शरद पवार थेट बोलणार आहेत. तसेच सिरमकडून राज्याला थेट कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, यासाठी केंद्राची परवानगी मागणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
Govt will complete 5 yrs, we’re together as MVA & ‘Operation Lotus’ can’t succeed: Maharashtra Min Nawab Malik on Devendra Fadnavis’statement that BJP will form govt later,if not during COVID
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
- ५-जी तंत्रज्ञानातून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी घातक, अभिनेत्री जुहीचा मोठा विरोध
- मुंबईतील झाडांना आता अमेरिकेतील जागतिक वनस्पतीशास्त्रज्ञ देणार जीवदान!
- सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीनींही केलं मुंबई मॉडलचे कौतुक, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला