महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. Farmers in trouble due to stubbornness of MSEDCL; Those farmers do not get DP if they do not pay their electricity bills
विशेष प्रतिनिधी
जालना : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचं अक्षरशः दिवाळ निघालं आहे. दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांना गोड लागली नाही.दरम्यान महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
महावितरणचा आडमुठेपणा
महावितरणच्या या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ही मोहीम तात्काळ थांबवा,अशी मागणी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर युवासेनेचे बंटीसेठ आटोळे,साष्टपिंपळगावचे विभाग प्रमुख रजनीश कनके,रमेश काळे,सुशांत गांगुर्डे,राहुल हार्दिक,सचिन देवकाते,राहुल हारे याच्या स्वाक्षरी आहेत.
सक्तीची वीजबिल वसुली सुरू
या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे.तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.यातून शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या संकटात अजून एक वाढ म्हणून महावितरणने आडमुठी भूमिका घेत सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे.
शेतमालाला पाणी असून वीज नाही
दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या डीपी या नादुरुस्त झाल्या आहेत.त्यांना त्या दुरुस्ती करून देण्यासाठी सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे.सध्या शेतमालाला पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही.शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.
Farmers in trouble due to stubbornness of MSEDCL; Those farmers do not get DP if they do not pay their electricity bills
महत्त्वाच्या बातम्या
- संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय ;भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका
- ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे ; पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ ही ‘ मागणी
- इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..
- हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन
- आदिवासींच्या धर्मांतराविरुध्द ऑपरेशन घरवापसीचा राजपुत्राचा एल्गार, छत्तीसगडमधील १२०० लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले
- पक्ष चालवायचा म्हणुन पवार हे देशमुखांचे समर्थन करतात, पण त्यांच्यासारख्या नेत्याने हे करणे अपेक्षित नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका
- राष्ट्रीय नेते शरद पवार उतरले जिल्हा बॅँक निवडणुकीच्या मैदानात, शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी फोनाफोनी