विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात रोज ४०० ते ७०० च्या आसपास मृत्यू होत आहेत. गुरुवारी ३०० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. आजवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ९७ हजारांहून अधिक आहे. यातील २,८३९ हून अधिक मृत्यू हे सहआजारांमुळे झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. Every day 400 death in Maharashtra due to corona
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट जाणवत आहे; तरीही मृतांचा आकडा वाढत असल्याबद्दल राज्य कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने चिंता व्यक्त केली आहे. यातील निम्म्या मृतांची संख्या १५ फेब्रुवारीनंतर नोंदवली गेली आहे. हे आकडे दुसऱ्या लाटेतील असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, देशभरातून झालेल्या मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले. मुंबईतील मृतांचा आकडा १४,९६५ इतका आहे. पुण्यात १२,७३७ मृत्यू नोंदले गेले. ठाण्यात ८,२५५ आणि नागपूरमध्ये ६,७८७ मृत्यूची नोंद झाली.
संपूर्ण देशाच्या तुलनेत आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आजवर जवळपास ५८ लाख जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. गुरुवारी नोंदवलेल्या ३०७ मृत्यूंपैकी २२८ हे गेल्या एका आठवड्यातील होते.
Every day 400 death in Maharashtra due to corona
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती
- निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- रामदेव बाबा यांचे अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ; दिल्ली उच्च न्यायालय