• Download App
    यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक । Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale

    निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

    Pandarpur Vari : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे. Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे.

    भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले म्हणाले की, यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी यावर वेळकाढूपणा न करता त्वरित वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत.

    राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे लवकरच अनलॉकही होण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांच्या मागणीवर आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    राहुल गांधींचा ममतांच्या विरुद्ध जोरात प्रचार; पण भाई जगतापांचा ममतांनाच कौल!!

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!