• Download App
    किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला येण्यासाठी रवाना! | Bjp leader kirit somaiya has finally left for kolhapur, irrespective of detention order

    किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला येण्यासाठी रवाना!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि बीजेपी नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच हाती आलेल्या बातमीप्रमाणे किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने ह्या पॅसेंजर ट्रेनने ते कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले आहेत. ही माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर वरून दिली आहे. अंबाबाईच्या दर्शनाची संधी मिळावी असेही त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

    Bjp leader kirit somaiya has finally left for kolhapur, irrespective of detention order

    आज सकाळी किरीट सोमय्या यांना त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केल्यानंतर बऱ्याच भाजप नेत्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून व्यक्त केल्या होत्या. भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले होते की,’किरीट सोमय्या दरोडेखोर आहेत की आतंकवादी आहेत? त्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी का केली जात आहे? सरकारने याचे उत्तर द्यावे.’


    किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रद्द, पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरी केले स्थानबद्ध! भाजप नेत्यांमध्ये तीव्र संताप


    आपले मत व्यक्त करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी असेही म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांना तुम्ही कधी अटक करणार आहात? तशी कायदेशीर लेखी नोटीस तुम्ही का देत नाहीये? सर्व यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करताना दिसून येते. किरीट सोमय्या यांना गणपती विसर्जनासाठी देखील जाऊ दिले नाही. याचा अर्थ काय? असा परखड सवाल पाटील यांनी विचारला आहे.

    Bjp leader kirit somaiya has finally left for kolhapur, irrespective of detention order

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!