• Download App
    बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचे रस्त्यावर आंदोलन, पोलिसांची रोखली गाडी|Barsu refinery survey issue flares up; Women's protest on the streets, the police stopped the car

    बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचे रस्त्यावर आंदोलन, पोलिसांची रोखली गाडी

    प्रतिनिधी

    मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडत पोलिसांची गाडी अडवली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी सर्वेक्षण करू दिले जाणार नाही यावर ग्रामस्थ ठाम असल्याने हा वाद पेटण्याची शक्यता आहे.Barsu refinery survey issue flares up; Women’s protest on the streets, the police stopped the car

    सर्वेक्षणाला विरोध 

    सध्या रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण सुरू आहे. यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.



    ग्रामस्थ आक्रमक 

    सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतरही स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. पोलिसांनी सोमवारी आंदोलकांना घरी पाठवले होते मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे ती जागा अद्याप आंदोलकांनी सोडलेली नाही. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यावर मंगळवारीही जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

    Barsu refinery survey issue flares up; Women’s protest on the streets, the police stopped the car

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rohit Pawar’ : रोहित पवारांचा दावा- फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला

    CM Devendra Fadnavis : धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही, कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

    नागपूर मेट्रो टप्पा – 2 चा विस्तार आणि मुंबईच्या सावरकर सागरी सेतू – वांद्रे किल्ला कनेक्टरला फडणवीस सरकारची मान्यता!!