• Download App
    पुण्यात भीषण दुर्घटना! मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू|A terrible accident in Pune A massive fire breaks out at a candle factory killing seven people so far

    पुण्यात भीषण दुर्घटना! मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू

    • मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याजवळील पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होते की काही वेळातच संपूर्ण कारखाना जळून खाक झाला.A terrible accident in Pune A massive fire breaks out at a candle factory killing seven people so far

    या प्रकरणी अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुढील तपास सुरू आहे. तर या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.



    सध्या मिळालेल्या माहितीनुसार, आग कारखान्याच्या गोदामाला लागली, तेथून ती हळूहळू संपूर्ण कारखान्यात पसरली. त्यामुळे इमारतीतील सर्व साहित्य जळून राख झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. तसेच कारखान्यातील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.

    ही भीषण दुर्घटना का घडली?

    ही दुर्घटना कशी काय घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज आहे. जखमींना पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    A terrible accident in Pune A massive fire breaks out at a candle factory killing seven people so far

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली