• Download App
    कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; कोकण कोल्हापुरात पुराचा धोका!!|Konkan, Central Maharashtra, Marathwada likely to receive torrential rains till July 8; Danger of flood in Konkan Kolhapur

    कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; कोकण कोल्हापुरात पुराचा धोका!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. कोकणात नद्यांना पूर आले असून नागरी जीवनाला धोका वाढला आहे कोल्हापूरमध्ये देखील पंचगंगा नदीला पूर आला असून तेथे पाण्याची पातळी आठ फुटापर्यंत वाढल्याने नागरिकांना देण्यात आला आहेKonkan, Central Maharashtra, Marathwada likely to receive torrential rains till July 8; Danger of flood in Konkan Kolhapur

    उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.



    तसेच 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मच्छीमारांना सूचना

    मच्छीमारांनी पुढील चार दिवस महाराष्ट्र – गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.

    Konkan, Central Maharashtra, Marathwada likely to receive torrential rains till July 8; Danger of flood in Konkan Kolhapur

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा