• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात; पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय

    बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Supriya Sule : शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा

    जित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले.

    Read more

    ‘Supreme Court : न्यायिक भ्रष्टाचार’ प्रकरण असलेल्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी; CJI म्हणाले होते- न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी कोणालाही नाही

    सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या आक्षेपानंतर ‘न्यायिक भ्रष्टाचार’ (ज्यूडीशियल करप्शन) या प्रकरणाच्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. NCERT च्या सूत्रांनी वृत्तसंस्था ANI ला याची पुष्टी केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बुधवारी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद] अजितदादांच्या अपघाताप्रकरणी DGCA, VSR वर गुन्हा दाखल करण्यास नकार, आता बारामतीत FIR दाखल करणार

    अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा अल्टिमेटम; जून महिन्यात उपोषणाला बसण्याचा इशारा; जीआर काढला, पण अंमलबजावणी का नाही?

    मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणाच्याही विनंतीकडे लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून, नव्या समितीच्या माध्यमातून प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    Read more

    Anil Ambani : ईडीने अनिल अंबानींचे 17 मजली घर जप्त केले; किंमत ₹3716 कोटी; 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

    अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुंबईतील ‘एबोड’ हा बंगला जप्त केला आहे. पीटीआय (PTI) नुसार, त्याची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे.

    Read more

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूरच; पवार कुटुंबाचा फायदा पण अनुयायी तोट्यात!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार जर महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार झाले तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आणखी दूर जाईल. यातल्या राजकारणात पवार कुटुंबाचा फायदा जरूर होईल, पण त्यांचे अनुयायी मात्र तोट्यात जातील.

    Read more

    बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तर शरद पवार दाखल करणार अर्ज??; पराभवाच्या भीतीने घेणार निर्णय??

    राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तरच शरद पवार अर्ज दाखल करणार का आणि पराभवाच्या भीतीने तसा निर्णय घेणार का??, असे दोन सवाल त्यांच्याच समर्थकांनी केलेल्या काही विश्लेषणावरून समोर आले.

    Read more

    AI मुळे जागतिक बाजारपेठेत मोठे बदल; कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र घडवायचा संकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे

    Read more

    पंतप्रधान पदाच्या शर्यतीतल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागतेय, हीच खरी बातमी!!

    एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागते आहे, हीच खरी बातमी आहे, असे म्हणायची वेळ सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हालचालींवरून आली आहे.

    Read more

    Unseasonal Rain : अवकाळी, गारपिटीने 7 जिल्ह्यांत 37 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; तत्काळ सर्वेक्षण, पंचनाम्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन

    वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात सोमवारी सुमारे ३७, ८५८ हेक्टरवरील पिके, फळांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जिल्ह्यांत गहू, ज्वारीचे पीक आडवे झाले. काढून ठेवलेला हरभरा भिजला. द्राक्षालाही मोठा फटका बसून भाजीपाला खराब झाला.

    Read more

    Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- डिजिटल अरेस्ट हा 100 टक्के फ्रॉडच, बळी पडू नका, थेट परदेशातून हलतात सूत्रे

    देशाच्या कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. असा कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो १००% फ्रॉड आहे हे ओळखा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सायबर भामट्यांबाबत माहिती दिली. आमदार अबू आसिम आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि धक्कादायक ‘मोडस ऑपरेंडी’ सभागृहासमोर मांडली.

    Read more

    Dada Bhuse : अर्थसंकल्पीय अधिवेशन : दादा भुसे म्हणाले- मराठवाडा, विदर्भातील 255 मराठी शाळा बंद, राज्यात 65 हजार शाळांत अजूनही सीसीटीव्ही नाही

    राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला. कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारला धारेवर धरले. “मंत्रालय चालते हप्त्याने, फाइल हलते पैशाने’’ अशा जळजळीत घोषणा देत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

    Read more

    शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी!!

    शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.

    Read more

    ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

    महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.

    Read more

    ग्रेटर निकोबार प्रकल्पासंदर्भात लिबरल मीडियाकडून जनसामान्यांचा बुद्धिभेद; नेमके वास्तव काय??

    केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही

    Read more

    लॅपटॉप टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी फडणवीस सरकारचे प्रोत्साहन, 600 कोटींच्या गुंतवणुकीचा करार, रोजगार निर्मितीवर भर

    केंद्रातल्या मोदी सरकारने पुढाकार घेऊन राबविलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय.

    Read more

    महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!

    महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.

    Read more

    एकनाथ शिंदेंना अजितदादांची जागा घ्यायची गरजच काय??; मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी झालीय ते बघा!!

    अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- दादा म्हणजे लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, विधिमंडळात अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सर्वच भावुक

    राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. त्यात ते म्हणाले की, अजितदादांच्या रूपाने मी एक जवळचा मित्र गमावला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने कधीतरी त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते.

    Read more

    Pune Spa Raid : पुण्यात स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

    विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.

    Read more

    महाराष्ट्रात 4537 अंगीकृत रुग्णालयांमध्ये 2399 रोग आणि विकारांवर मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ

    केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.

    Read more

    MSRTC : राज्य परिवहन मंडळाची घोषणा- आता ‘गाव तिथे एसटी’ नव्हे, ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’

    सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आता आदिवासी पाडा तिथे एसटी’ असा ठाम निर्धार करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.

    Read more

    अजितदादांचे गुणवर्णन करताना मुख्यमंत्र्यांना महाकवी भास आणि कवी पी. सावळाराम यांच्या काव्याची आठवण

    महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे.

    Read more

    महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी; पण आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडेच देण्यासाठी संजय राऊत उतावळे!!

    महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच उरली नाही. याचे प्रत्यंतर काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आले. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी दांडी मारली, तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी संजय राऊत आज उतावळे झाले.

    Read more