• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची 25-30 वाहनांना धडक, 30 ते 35 प्रवासी जखमी

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    Read more

    Khadse : एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना थेट आव्हान; प्रॉपर्टी, मुलाच्या मृत्यूची चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा!

    जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आता खडसेंनी महाजनांना तीन मोठी आव्हानं दिली आहेत.

    Read more

    महाराष्ट्राच्या इतिहासात 70 वर्षांमध्ये झाली नाही, एवढी गेल्या 150 दिवसांमध्ये बदनामी; सुप्रिया सुळेंच्या “जावईशोधाची” नोंद फडणवीस सरकारने गॅझेट मध्ये करावी!!

    महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.

    Read more

    हिंजवडीचं लवासा झालंय का??; पुतण्यानेच काकांच्या विकासाच्या दृष्टीचे वाभाडे काढले का??

    हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.

    Read more

    Sanjay Shirsat : सामनामधील बातम्यांना अर्थ नसतो! मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचा टोला

    राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांचे राज्य सरकारला आवाहन- धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत; पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका

    माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी

    Read more

    Ajit Pawar : मंत्रिमंडळात फेरबदलावर अजित पवार म्हणाले- हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार; कोकाटे-सूरज चव्हाणवरही केले भाष्य

    राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे?

    Read more

    Vijay Ghadge : अजित दादांचा घाडगेंना शब्द: माणिकराव कोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार

    अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले.

    Read more

    Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू

    अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे ५० कंपन्यांवर आणि ३५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) २४ जुलै रोजी मोठी कारवाई केली. ही कारवाई मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी करण्यात आली असून, यामागे ३००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.

    Read more

    Bombay HC : हायकोर्टाने म्हटले- रस्ता खराब असल्यास फक्त कंत्राटदार कंपनीवरच FIR का? PWD अधिकारी कसे सुटू शकतात?

    मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा रस्ते बांधकामात निष्काळजीपणा होतो, तेव्हा फक्त कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांविरुद्धच एफआयआर का दाखल करण्यात आला? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांची जबाबदारी का निश्चित करण्यात आली नाही?

    Read more

    फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल झालाच, तर त्यात विरोधकांना credit किती??

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होईल. चार वादग्रस्त मंत्र्यांबरोबरच अन्य चार मंत्र्यांना हे नारळ देण्यात येईल, अशा गौप्यस्फोटाच्या बातम्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यांनी मराठी माध्यमांनी पेरल्या.

    Read more

    Ajit Pawar : ‘आता तिजा होऊ देणार नाही’, कृषिमंत्री कोकाटेंवर अजित पवारांचे कारवाईचे स्पष्ट संकेत

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील ऑनलाईन रमी प्रकरणी लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, याआधीही त्यांनी कोकाटेंना योग्य इशारा दिला होता की ‘इजा-बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका’. मात्र आता पुन्हा एकदा प्रकरण घडल्याने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.

    Read more

    Fadnavis : JNUमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भाषण: मराठीचा अभिमान, शिवरायांचे सामर्थ्य आणि भाषावादावर ठाम मत

    दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा आणि शिवरायांच्या सामरिक शिक्षणावर आधारित दोन महत्त्वपूर्ण केंद्रांचे उद्घाटन केले. या वेळी दिलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषा, इतर भारतीय भाषांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे सामरिक विचार आणि सध्या सुरू असलेल्या भाषावादावर सखोल भाष्य केले. भाषणात त्यांनी भाषा, संस्कृती आणि अभिमान यांचे समतोल साधताना एक समंजस, पण ठाम भूमिका मांडली.

    Read more

    Shinde’s : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक विधान

    महाराष्ट्रात सध्या आमदारांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कोणी मारामारी करत आहे, तर कोणाच्या घरात पैशांनी भरलेली बॅग दिसून येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.

    Read more

    फडणवीसांची पवारांशी तुलना हा त्यांचा गौरव??… की…

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.

    Read more

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत

    राज्य सरकारने सुमारे १८ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ जाहीर केले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत मराठी माणसासाठी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. मात्र, या धोरणानुसार विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक शुल्क तसेच एफएसआयमध्ये (चटई क्षेत्र निर्देशांक) सवलत दिली जाणार आहे.

    Read more

    Vijaykumar Ghadge : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे थेट अजित पवारांना विचारणार जाब; “माझं चुकलंच काय?” असा सवाल करत मुंबईकडे प्रस्थान

    छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीचा जाब थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्याचा निर्णय घेतला आहे. “मी काय चूक केली? मी कुणाला वाईट बोललो का? जर काही चूक झाली असेल, तर त्यांनीच मला समोर सांगावं, असे सांगत ते लातूर येथी रुग्णालयातून थेट मुंबईला निघाले आहेत.

    Read more

    Girish Mahajan : “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

    राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत?” असा खोचक सवाल करत महाजन यांनी प्रफुल लोढा आणि खडसे यांचा एकत्र फोटो X (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : फडणवीसांची पवारांशी तुलना हा त्यांचा सन्मान??… की…

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.

    Read more

    Eknath Khadse : प्रफुल लोढाकडे महत्त्वाचे पुरावे असल्यानेच अडकवले जात आहे, एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर पलटवार

    राज्यात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रफुल लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे असल्यानेच त्याला विविध गुन्ह्यांमध्ये अडकवून जाणीवपूर्वक ताब्यात ठेवण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा आरोप- कलाकेंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार; पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

    पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी

    राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसतानाच दुसरीकडे बँकांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. अमरावतीमध्ये एका बँक मॅनेजरला थेट फोन करून ‘शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली, तर तिथेच ठोकून काढू!’ अशी इशारा वजा धमकी बच्चू कडू यांनी दिली.

    Read more

    Vijay Vadettiwar हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ५० मंत्री-अधिकाऱ्यांचा समावेश, लोढाकडून २०० कोटींची वसूली

    राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक आरोप करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.

    Read more

    फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळांचे सत्ता वाटप बिनबोभाट!!

    फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळाचे सत्ता वाटप बिनबोभाट!!, हे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकारने घडवून आणले.

    Read more