• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Mumbai Redevelopment : मुंबई पुनर्विकासाला गती; 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबईतील पुनर्विकास प्रक्रियेतील भाडेकरूंना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान नवीन इमारतीत जागा मिळणाऱ्या भाडेकरूंना आता नोंदणी फीपासून पूर्ण सवलत देण्यात येणार आहे. आतापर्यंत 400 चौरस फुटापर्यंत ही सवलत लागू होती. मात्र यामध्ये मोठा बदल करत सरकारने मर्यादा थेट 600 चौरस फुटांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून पुनर्विकास प्रक्रिया अधिक गतीने होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Shinde : मित्रपक्षातून येणाऱ्यांना थांबवा; शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश, दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर नवा पवित्रा

    भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.

    Read more

    Maharashtra Govt : आमदार-खासदार कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी उभे राहावे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना

    आमदार किंवा खासदार कार्यालयात भेट देण्यासाठी आल्यावर जागेवरून उठून उभे राहा, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि फोनवर बोलतानाही नम्र भाषेचा वापर करा, अशा नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जारी केल्या. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे.

    Read more

    कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा!!; भाजपच्या स्वबळाचा राष्ट्रवादीला तोटा!!

    कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा दिला. भाजपच्या स्वबळाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला असा फटका दिला.

    Read more

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानी पोलीस आयुक्तालयात, सलग दुसऱ्यांदा चौकशी पण अजूनही नाही अटक!!

    पार्थ पवारच्या मुंढवा जमीन घोटाळ्यात शितल तेजवानी सलग दुसऱ्यांदा पोलीस आयुक्तालयात हजर झाली. पोलिसांनी तिची दुसऱ्यांदा चौकशी केली. तिला सर्व कागदपत्रांसह पुन्हा हजर राहायला सांगितले. परंतु, अजूनही पोलिसांनी तिला अटक केली नाही.

    Read more

    एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचेय, म्हणून तर…

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचे आहे, म्हणून तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काल गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भेटीची वेळ देऊन प्रत्यक्ष भेट दिली

    Read more

    राष्ट्रवादीतल्या “दादा” लोकांना भाजपने केले “सरळ”; स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतच आणले गुडघ्यांवर!!

    राष्ट्रवादीतल्या “दादा” लोकांना भाजपने केले “सरळ”; स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतच आणले गुडघ्यांवर!!, असे राजकीय चित्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या काही विशिष्ट जिल्हे आणि शहरांच्या अंतर्गत राजकारणातून समोर आले.

    Read more

    पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!

    पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!, ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय अवस्था येऊन ठेपली आहे.

    Read more

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला कुठलीही क्लीन चिट नाही; पोलीस डायरीतल्या नोंदी काय सांगतात??

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ अजित पवारला क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या सगळीकडे पेरल्या गेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याला कुठलीही क्लीन चीट मिळालेली नाही. कारण पोलीस डायरीमध्ये त्या संदर्भात वेगळ्याच नोंदी आहेत.

    Read more

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर; दोन्हीकडे “पवार संस्कारितांची” भांडणे उघड्यावर!!

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर आली, पण या दोन्हीकडे “पवार संस्कारितांनीच” आपली भांडणे उघड्यावर आणली.

    Read more

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.

    Read more

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर व्यवहार रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रशासनाने जो पर्यंत ४२ कोटी रुपये भरत नाही तो पर्यंत व्यवहार रद्द होणार नाही अशी नोटीस दिली असून त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

    Read more

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळले आहे. एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? असा उलट सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

    Read more

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    स्थानिक राजकारणाच्या गदारोळात दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच एकमेकांना फोडून स्वबळ वाढवायची स्पर्धा लागली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचे पडसाद फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बैठकीत आणि नंतर उमटले, पण सकाळची नाराजी संध्याकाळच्या तोडग्यामुळे संपुष्टात आली.

    Read more

    शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 7 मंत्री नाराज झाले आणि त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या दालनात जाऊन उघडपणे बोलून दाखविली.

    Read more

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी झाली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात संताप उसळला. संबंधित ओल्या पार्टीचे आयोजक महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालयात होते

    Read more

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलादालनाचे उद्घाटन केले. या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही

    शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा दावा- धनंजय मुंडेंचे अजित पवारांसमोर लोटांगण; चौकशीतून वाचवण्याची केली विनवणी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

    Read more

    Amit Thackeray : अमित ठाकरे म्हणाले- कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला हे चांगले:राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कोर्टात जाईन

    कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

    Read more

    Maharashtra Winter : 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; अतिवृष्टीची मदत, कर्जमाफीवरून विरोधकांची घेरण्याची तयारी

    राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.

    Read more

    मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता.

    Read more

    येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!

    येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!, अशा पद्धतीचे दुहेरी राजकारण आज भाजपने खेळले

    Read more

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा- हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली; स्थानिकच्या निवडणुकांतही ‘माती’ होण्याचे भाकीत

    विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more