उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.
लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.
मी अफझल गुरुला आणि कसाबला फाशी दिली, पण लोकसभा निवडणुकीत काही दळभद्री विरोधकांनी याच कसाबची बाजू घेतली,” असा घणाघात भाजपा खासदार आणि ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सिन्नर येथील आपला मेळावा रद्दबातल केला आहे.
राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. धनंजय यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी याला कडाडून विरोध केला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्यावे, असे त्या म्हणाल्यात.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासगुडा भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ नक्षलवाद्यांना ठार मारले. या सर्वांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत ज्यात INSAS-SLR रायफल्सचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आता खडसेंनी महाजनांना तीन मोठी आव्हानं दिली आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.
बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजय दिन परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.
थायलंड आणि कंबोडियामध्ये १००० वर्षे जुन्या दोन शिवमंदिरांवरून सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लढाईत त्यांच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ नागरिक आणि पाच सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय ७१ जण जखमी झाले आहेत.
संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.
हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.
उत्तर चीनमधील बाओडिंग शहरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४४८.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरी वर्षभराच्या पावसाइतकी (५०० मिमी) आहे. मुसळधार पावसामुळे औद्योगिक शहरात पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले, पूल आणि रस्ते तुटले आणि काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी बाओडिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
ज्या उत्तर प्रदेशाला मागास म्हणून आतापर्यंत सगळ्या देश हिणवत आला होता, तिथे कुशल कामगार आहेत आणि ते केवळ देशातच नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत असे आता सिद्ध झालेय.
अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली.
कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.
भारत आता पायलटशिवाय हवाई ड्रोन वापरून दूरवरून शत्रूच्या बंकर किंवा टँकना लक्ष्य करू शकतो. कारण डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील राष्ट्रीय ओपन एरिया टेस्टिंग रेंजमध्ये ड्रोन-लाँच केलेल्या प्रिसिजन गाईडेड-व्ही३ ची चाचणी घेतली आहे. ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेअर केली. संरक्षण मंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ड्रोनमधून केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे दृश्ये आहेत.