न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटची धमाल!!
न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटचे धमाल!! असे अनोखे दृश्य दिल्लीच्या रस्त्यावर दिसले.
न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटचे धमाल!! असे अनोखे दृश्य दिल्लीच्या रस्त्यावर दिसले.
दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
भेटली नऊ महिन्यांनी!! पृथ्वी कन्या सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतली. ही भेट तब्बल नऊ महिन्यांनी झाली.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने आणि १४ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर आहेत, अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. १ मार्च रोजी लिहिलेले हे पत्र नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी पाठवले होते. हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर शेअर केले आहे.
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येईल.
गाझामध्ये युद्धबंदी असताना, इस्रायलने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात २०० हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. मृतांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या समर्थित संघटना ओएसएफ (ओपन सोसायटी फाउंडेशन) आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांवर कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने बंगळुरूमधील ओएसएफ आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा छापा टाकण्यात आला.
झारखंडमधील देवघरमधील जसिडीह येथील इंडियन ऑइल प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीने इंडियन ऑइल प्लांटच्या संपूर्ण कॅम्पसला वेढले आहे. आगीचे भीषण रूप पाहून पोलीस आजूबाजूची गावे रिकामी करत आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जवळजवळ नऊ महिने घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. स्पेसएक्सचे कॅप्सूल क्रू-९ सुनीता आणि विल्मोर यांना आयएसएसमध्ये घेऊन निघाले आहे. तर पृथ्वीवर परतल्यानंतर, सुनीता विल्यम्स लवकरच भारतात येऊ शकतात. पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहून भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा करतील. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे.
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विधान परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांची माफी मागितली होती. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करायचे आहे असे सांगितले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी या विषयावर आपले मत बदलले होते.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी २ लाख ५ हजार १७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी १.८९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पात १३.७% म्हणजेच सुमारे १६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.
निर्यातीत वाढ झाल्यामुळे, भारताची मर्चेंडाइज ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट फेब्रुवारी २०२५ मध्ये १४.०५ अब्ज डॉलर्स (१.२१ लाख कोटी रुपये) पर्यंत कमी झाली. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये ते २२.९९ अब्ज डॉलर (१.९९ लाख कोटी रुपये) होते. ही तूट ऑगस्ट २०२१ नंतरची सर्वात कमी आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड यांनी भारतात सतत होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना इस्लामिक दहशतवाद म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, हा दहशतवाद भारत आणि अमेरिकेसह अनेक मध्यपूर्वेतील देशांसाठी धोका बनत आहे.
नागपुरातील दंगली दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना कठोर शासन करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलून दाखवला.
ईदनंतर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक Waqf Bill मांडले जाऊ शकते. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत प्रचंड संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा ‘गेटवे टू द वर्ल्ड’ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार, मलेशिया, भारत आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला.