दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात “राजकीय काडी”; एकनाथ शिंदेंना शरद पवार घालणार शिंदेशाही पगडी!!
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
भाजपचे खासदार अनुराग ठाकूर त्यांनी राहुल गांधींना दाखवली 0 ची पाटी आणि सुप्रिया सुळे यांची देखील उडवली खिल्ली!! लोकसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळी हे घडले.
पालक आणि महिलांवर अश्लील टिप्पण्या केल्याबद्दल युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
किन्नर आखाड्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून याची घोषणा केली. ममता म्हणाल्या, आज किन्नर आखाड्यात माझ्याबद्दल वाद सुरू आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वी राहीन.
‘परीक्षा पे चर्चा’ च्या आठव्या आवृत्तीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी बोर्ड परीक्षांबद्दल बोलले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले- आपल्याकडे दिवसाचे फक्त २४ तास आहेत. काही लोक इतक्या वेळेत सर्वकाही करतात, तर काही जण म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही. अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन शिकणे खूप महत्वाचे आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
सोन्याने सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६६९ रुपयांनी वाढून ८५,३६८ रुपये झाली आहे. यापूर्वी सोन्याचा दर ८४,६९९ रुपये प्रति दहा ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर होता.
नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (PSO) निलंबित करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्यानंतर ओमर सरकारने ही कारवाई केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंजाबमध्येही गोंधळ सुरू झाला आहे. पंजाब काँग्रेसचा दावा आहे की, आम आदमी पक्षाचे (आप) 30 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरणांतर्गत, २०२४ मध्ये एनसीबीसह देशभरातील सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांनी सुमारे २५३३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले, जे २०२३ मध्ये जप्त केलेल्या १६१०० कोटी रुपयांच्या तुलनेत ५५ टक्क्यांहून अधिक आहे.
अश्लील विनोद प्रकरणात युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून राजीनामा जाहीर केला. ममता कुलकर्णी म्हणाल्या की, आज किन्नर आखाड्यात किंवा दोन्ही आखाड्यांमध्ये माझ्याबद्दल वाद आहे, ज्यामुळे मी राजीनामा देत आहे.Mamta Kulkarni
दिल्ली विधानसभा निवडणुकीतून धडा शिकायला ममता बॅनर्जींचा नकार; म्हणाल्या बंगाल मधून काँग्रेसच हद्दपार!! Bengal दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 10 फेब्रुवारी रोजी तृणमूळ काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची कोलकत्यात बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसशी आघाडी करायला नकार दिला. पश्चिम बंगालमध्ये मूळात काँग्रेस आता अस्तित्वातच उरलेली नाही. त्यामुळे त्या पक्षाबरोबर युती काय करणार??, असा सवाल त्यांनी केला. पण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता असा दावाही त्यांनी केला.
इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता शांतता करार झाला आहे. याअंतर्गत, इस्रायल अटक केलेल्या हमास कैद्यांना सोडेल आणि हमास अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडेल.
कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने मुंबई विमानतळावर बँकॉकहून अवैध वस्तूंची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून ८.१५५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत सुमारे ८.१५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
चार वर्षांनंतर सत्तेत परतल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक जलद निर्णय घेत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी धक्कादायक निर्देश जारी केले आहेत. ट्रम्प यांनी ट्रेझरी विभागाला नवीन नाणी तयार करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी यामागे जास्त खर्च असल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी फ्रान्सला रवाना झाले. ते तिथे एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करतील.
जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. सीबीआय अंतर्गत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने चारही जणांना अटक केली आहे.
मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.
सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळावर पोहोचले. यानंतर दोघेही संगम क्षेत्रात पोहोचले. त्या आज आठ तासांपेक्षा जास्त काळ संगम शहरात असतील.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
वृत्तसंस्था बिजापूर : Chhattisgarh छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी झालेल्या चकमकीत १००० हून अधिक सैनिकांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या चकमकीत २ डीआरजी आणि एसटीएफ जवान […]
अवैध वाळू उत्खनन, चोरटी वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हा दाखल असलेल्या ९ जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी केली. त्यांना जालना, संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यांत प्रवेशास मनाई केली.
पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची पुडी; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यामध्ये उडी!! असे चित्र महाराष्ट्रात दिसले.