Madhya Pradesh : वक्फ कायदा लागू झाल्यानंतर मध्य प्रदेशात पहिली कारवाई, सरकारी जमिनीवर बांधलेला मदरसा पाडला
देशात वक्फ कायदा लागू झाल्यानंतर, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका बेकायदेशीर मदरशावर पहिली कारवाई करण्यात आली. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर मदरसा चालवल्याच्या तक्रारीनंतर तो पाडण्यात आला. एका स्थानिक रहिवाशाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार विष्णू दत्त शर्मा यांच्याकडे सरकारी जमिनीवर बेकायदेशीर मदरसा चालवल्याबद्दल तक्रार केली होती. एसडीएमने मदरसा संचालकाला नोटीस बजावली होती. एसडीएमकडून सूचना मिळाल्यानंतर, मदरसा संचालकाने मजूर कामावर ठेवले आणि स्वतः इमारत पाडली.