Assam : तमिळ-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये आसामी भाषा सक्तीची
आसाममध्ये, बराक खोऱ्यातील तीन जिल्हे आणि बोडोलँड टेरिटोरियल रीजन (BTR) चे पाच जिल्हे वगळता राज्यातील सर्व अधिकृत कामांमध्ये आसामी भाषेचा वापर अनिवार्य असेल.
आसाममध्ये, बराक खोऱ्यातील तीन जिल्हे आणि बोडोलँड टेरिटोरियल रीजन (BTR) चे पाच जिल्हे वगळता राज्यातील सर्व अधिकृत कामांमध्ये आसामी भाषेचा वापर अनिवार्य असेल.
संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्या प्रेरित आणि निराधार असल्याचे सांगत भारत सरकारने मंगळवारी त्या फेटाळून लावल्या. पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत स्वतःच्या ‘खराब’ रेकॉर्डकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.
ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरात संताप आहे. बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचारावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.
मार्चमध्ये किरकोळ महागाई दर जवळपास ५ वर्षे ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. मार्चमध्ये तो ३.३४% होता. ऑगस्ट २०१९ मध्ये महागाई दर ३.२८% होता.
वक्फ कायद्याच्या निषेधार्थ बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हरदोई येथे म्हणाले- लातो के भूत बातो से नही मानते. दंगलखोर फक्त लाठ्यांचेच ऐकतील. ज्याला बांगलादेश आवडतो, त्याने बांगलादेशला जावे.
राजस्थानमधील झुंझुनू येथून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी १३ तरुण-तरुणींना अटक केली आहे. मायक्रोसॉफ्टशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आरोपींनी इंटरनेट मीडियावर हेल्पलाइन नंबर पोस्ट केले होते.
वक्फ कायद्याबाबत पाकिस्तानने केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. भारताने म्हटले आहे की, इतरांना उपदेश करण्याऐवजी पाकिस्तानने अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या स्वतःच्या रेकॉर्डकडे लक्ष द्यावे.
झारखंडच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने आता पक्षाची कमान राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सोपवली आहे. पक्षाच्या १३ व्या महाअधिवेशनात त्यांची झामुमोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच वेळी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि झामुमोचे मजबूत चेहरा शिबू सोरेन यांना आता ‘संस्थापक संरक्षक’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर मध्ये प्रचंड हिंसाचार घडवून तिथल्या हिंदूंना कायमचे पलायन करायला लावण्याच्या निंदनीय घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी घेतली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने असा विचार करणे थांबवावे की त्यांच्याकडे अण्वस्त्रे असू शकतात. हे अतिरेकी लोक आहेत आणि त्यांना अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
Waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतल्यानंतर त्या राज्यातल्या कट्टरपंथी मुस्लिमांना चेव आला आणि त्यांनी मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा या जिल्ह्यांमध्ये दंगली घडविल्या, पण या दंगलीच्या निमित्ताने तिथून त्यांनी हिंदू समाजाला कायमचे पलायन करायला भाग पाडले. याच्या बातम्या मात्र मराठी माध्यमांमध्ये फारशा आल्या नाहीत.
अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. १४ एप्रिल (सोमवार) रात्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून एक ई-मेल आला. त्यात लिहिले आहे- मंदिराची सुरक्षा वाढवा. ट्रस्टचे अकाउंट ऑफिसर महेश कुमार यांनी मंगळवारी सायबर सेलमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा खासदार सोनिया गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने हे लक्षात ठेवावे की जेव्हा नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले नव्हते तेव्हा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हरियाणातल्या गुरुग्राम मधली जमीन हडपण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने सोनिया गांधींचे जावई, प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना चौकशी आणि तपासाचे समन्स पाठवल्यानंतर ते काल घरातून पायी चालत येऊन ED ऑफिसमध्ये दाखल झाले.
National herald case मध्ये ED ने काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात राऊज नवीन कोर्टात खटला दाखल केल्यानंतर काँग्रेसने आज देशभरात निदर्शने आयोजित केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे. या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
नाशिक मधल्या काठे गल्ली परिसरातील सातपीर नावाच्या अनधिकृत दर्ग्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून तो दर्गा काढून टाकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, येथे महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDPT) बंगळुरु आणि स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, बंगळुरु यांच्यामध्ये युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सहारा ग्रुपविरुद्ध मोठी कारवाई केली आहे आणि महाराष्ट्रातील लोणावळा येथील आंबी व्हॅली सिटीमधील ७०७ एकर जमीन जप्त केली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत १,४६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकरणात वादग्रस्त भाष्य करण्याचे टाळावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाला सांगितले. १० एप्रिल रोजी बलात्काराच्या आरोपीला जामीन देताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘पीडित मुलीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले आहे, ती बलात्कारासाठी जबाबदार आहे.’
घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करणारे लोक हवेत आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो असा टाेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांना लगावला.
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत.
नाशिकच्या काठी गल्ली परिसरातला अनधिकृत सातपीर दर्गा हटवायला विरोध करणाऱ्या जमावाने ताल मध्यरात्रीनंतर पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली.