शरद पवार “भाजपमय” होत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा इशारा; पण धोका काँग्रेसला +अजितदादांना की भाजपला??
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची चव चाखवली. भारताने केवळ दहशतवाद्यांवर प्रहार केला नाही, तर जगाला स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कारवाई करतो, शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवतो. मात्र, या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसने आपले क्षुद्र राजकारणाचे शस्त्र म्यान केलेले दिसत नाही.
निदर्शकांनी केली जाळपोळ; आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय लष्कराकडून झालेल्या दारुण पराभवावर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात बनवटा अभिमान निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर पदोन्नती दिली आहे. १९५९ नंतर हे पद दिलं गेलेलं हे केवळ दुसरं उदाहरण असून, यामागे खऱ्या शौर्यापेक्षा राजकीय प्रदर्शन अधिक दिसून येत आहे.
आता पाश्चिमात्य देशही उघडपणे इस्रायलच्या विरोधात उभे राहत आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडाने इस्रायलला गाझामधील युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमधील बटाला येथे दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जतीन कुमार उर्फ रोहन हा दहशतवादी जखमी झाला. या मॉड्यूलच्या एकूण ६ इतर दहशतवाद्यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
operation sindoor दरम्यान वादग्रस्त ट्विट करून देशाविरुद्ध भूमिका जाहीर करणाऱ्या राज्यशास्त्राचा प्राध्यापक अली खान मेहबूदाबाद याला सुप्रीम कोर्टाने आज जामीन मंजूर केला.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने गंभीर खुलासे केले आहेत. त्यात म्हटले आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या एका स्थानिक नेत्याची हिंसाचारात भूमिका होती. स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम यांनी हे हल्ले केले.
शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यांनी मुलीला मुलाप्रमाणे वाढविले. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले
चीनमध्ये सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना दारू आणि सिगारेटवरील खर्च कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, लोकांना प्रवास, जेवण आणि ऑफिसच्या ठिकाणांवरील खर्च कमी करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची सोमवारी एनआयए, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि गुप्तचर पथकाने चौकशी केली. तिच्या दहशतवादी संबंधांबद्दल तिची चौकशी करण्यात आली.
मिस्टर बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले यूट्यूबर जिमी डोनाल्डसन अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांची संपत्ती १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,५०० कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, तो जगातील ८ वा सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे. मिस्टर बीस्टचे मासिक उत्पन्न सुमारे ५० दशलक्ष डॉलर्स (४२७ कोटी रुपये) आहे.
साध्या पण थेट सवालांवर माझी प्रमुख अमरजीत सिंह दुलत भडकले आणि भर मुलाखतीत पत्रकारालाच मारायला धावले. भारत रफ्तार टीव्हीच्या मुलाखती दरम्यान हा किस्सा घडला.
भारतानंतर आता अफगाणिस्तानही पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची तयारी करत आहे. तालिबान सरकारचे आर्मी जनरल मुबिन यांनी कुनार नदीवर बांधल्या जाणाऱ्या धरणाची पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
मासेमाऱ्यांनी खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
१२ दिवसांच्या अंतरानंतर मंगळवारी पंजाब फ्रंटियरच्या अटारी संयुक्त सीमा क्रॉसिंगवर ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभ पुन्हा सुरू झाला.
कोविड-१९ ने पुन्हा एकदा चिंता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. लोक आतापर्यंत महामारीचा तो काळ विसरलेले नाहीत. लॉकडाऊन आणि भीतीदायक परिस्थितीमुळे प्रत्येकाच्या मनात वाईट आठवणी राहिल्या आहेत. पण पुन्हा एकदा या साथीचे संकेत दिसत आहेत.
पाकिस्तानात काही झाले कुठली उलथापालट झाली तरी लष्कराला त्याची डग लागत नाही याचे प्रत्यंतर आता आले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी सांगितले की, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचा (BTA) पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याशी त्यांची चर्चा यशस्वी झाली.
Waqf सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांना आज सुप्रीम कोर्टाने फटकारले. संसदेला कुठलाही कायदा संमत करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामध्ये घटनात्मक उल्लंघन झाले, याचे सबळ पुरावे समोर आणल्याशिवाय सुप्रीम कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला सातत्याने उघड करत आहे. या संदर्भात, देशाच्या एका शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पॅनेलला भेट दिली आहे. भारतीय शिष्टमंडळाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेविरुद्ध काही पुरावे सादर केले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) गुन्हेगारांना अभूतपूर्व वेगाने पकडण्यासाठी एक नवीन ई-झिरो एफआयआर उपक्रम सुरू केला आहे.