• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 160 of 1425

    Pravin Wankhade

    Bawankule : राहुल गांधींची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे जिवंत उदाहरण; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

    राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

    Read more

    Uddhav Thackeray’ : उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात; स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपात दिसतील – गिरीश महाजन

    उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    Karuna Sharma : धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्या; करुणा शर्मा यांची अजित पवारांकडे मागणी

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. धनंजय यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी याला कडाडून विरोध केला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्यावे, असे त्या म्हणाल्यात.

    Read more

    Bijapur : बिजापूरमध्ये सैनिकांनी 4 नक्षलवाद्यांना ठार केले; मृतदेह-शस्त्रे जप्त, बासगुडा परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू

    छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासगुडा भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ नक्षलवाद्यांना ठार मारले. या सर्वांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत ज्यात INSAS-SLR रायफल्सचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.

    Read more

    Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची 25-30 वाहनांना धडक, 30 ते 35 प्रवासी जखमी

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    Read more

    Khadse : एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना थेट आव्हान; प्रॉपर्टी, मुलाच्या मृत्यूची चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा!

    जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आता खडसेंनी महाजनांना तीन मोठी आव्हानं दिली आहेत.

    Read more

    Mumbai Airport Terminal 1 : मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 बंद होणार; 10 कोटी प्रवासी नवी मुंबईकडे वळणार

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.

    Read more

    लोचटगिरीची हद्द… काँग्रेसचा नेता म्हणे, राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात !

    काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.

    Read more

    Aparajita : बलात्कारविरोधी ‘अपराजिता विधेयक’ राज्यपालांनी परत पाठवले; कठोर शिक्षांवर केंद्र सरकारचे आक्षेप

    पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.

    Read more

    Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी; कुन्हा आयोगाने म्हटले- RCB, इव्हेंट कंपनी आणि राज्य क्रिकेट असोसिएशन जबाबदार

    बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजय दिन परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.

    Read more

    महाराष्ट्राच्या इतिहासात 70 वर्षांमध्ये झाली नाही, एवढी गेल्या 150 दिवसांमध्ये बदनामी; सुप्रिया सुळेंच्या “जावईशोधाची” नोंद फडणवीस सरकारने गॅझेट मध्ये करावी!!

    महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.

    Read more

    Thailand-Cambodia : थायलंड-कंबोडिया संघर्षात 33 मृत्यू; कंबोडियाने ग्रॅड क्षेपणास्त्रे डागली, थायलंडने मार्शल लॉ जाहीर केला

    थायलंड आणि कंबोडियामध्ये १००० वर्षे जुन्या दोन शिवमंदिरांवरून सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लढाईत त्यांच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ नागरिक आणि पाच सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय ७१ जण जखमी झाले आहेत.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा पुढाकार, देशातील शिक्षण संस्थांना महत्त्वाचे 15 निर्देश

    संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.

    Read more

    हिंजवडीचं लवासा झालंय का??; पुतण्यानेच काकांच्या विकासाच्या दृष्टीचे वाभाडे काढले का??

    हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.

    Read more

    China : चिनी राज्यात 24 तासांत वर्षभराइतका पाऊस; रस्ते-घरे पाण्याखाली, रेड अलर्ट जारी; 19 हजार लोकांचे स्थलांतर

    उत्तर चीनमधील बाओडिंग शहरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४४८.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरी वर्षभराच्या पावसाइतकी (५०० मिमी) आहे. मुसळधार पावसामुळे औद्योगिक शहरात पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले, पूल आणि रस्ते तुटले आणि काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी बाओडिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.

    Read more

    Sanjay Shirsat : सामनामधील बातम्यांना अर्थ नसतो! मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचा टोला

    राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.

    Read more

    इजरायल मध्ये काम करून उत्तर प्रदेशातल्या 6000 कामगारांनी तब्बल 1400 कोटी रुपये घरी धाडले; आणखी 3000 कामगार इजरायलला जाण्याच्या तयारीत

    ज्या उत्तर प्रदेशाला मागास म्हणून आतापर्यंत सगळ्या देश हिणवत आला होता, तिथे कुशल कामगार आहेत आणि ते केवळ देशातच नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत असे आता सिद्ध झालेय.

    Read more

    Rahul Gandhi अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!

    अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली.

    Read more

    Kargil War : कारगिल विजय दिन; पंतप्रधानांनी लिहिले- शूर सुपुत्रांच्या धाडसाला सलाम; 2 केंद्रीय मंत्र्यांनी द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली

    कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    DRDO : DRDOची ड्रोनवरून ULPGM-V3 क्षेपणास्त्र चाचणी; ड्युअल-चॅनेल हाय डेफिनेशन सीकरने सुसज्ज

    भारत आता पायलटशिवाय हवाई ड्रोन वापरून दूरवरून शत्रूच्या बंकर किंवा टँकना लक्ष्य करू शकतो. कारण डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील राष्ट्रीय ओपन एरिया टेस्टिंग रेंजमध्ये ड्रोन-लाँच केलेल्या प्रिसिजन गाईडेड-व्ही३ ची चाचणी घेतली आहे. ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेअर केली. संरक्षण मंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ड्रोनमधून केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे दृश्ये आहेत.

    Read more

    PM Modi : PM मोदी 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर पोहोचले; राष्ट्रपती मुइझ्झूंनी विमानतळावर केले स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर पोहोचले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली.

    Read more

    OTT Platforms : उल्लू-अल्टसह 25 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारची बंदी; अश्लील कंटेंट दाखवल्याने कारवाई

    केंद्र सरकारने शुक्रवारी अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अ‍ॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते.

    Read more

    Narendra Modi : सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे मोदी दुसरे; इंदिरा गांधींचा 4077 दिवसांचा विक्रम मोडला

    नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ४०७७ दिवसांचा (२४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७) विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांचे राज्य सरकारला आवाहन- धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत; पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका

    माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी

    Read more

    CJI Bhushan Gavai ; निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान

    सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.

    Read more