अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची उबळ, ताकद नाही त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!
अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जी स्वबळाची उबळ आणली, तिच्या मागे ताकद नाही, त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात त्यांना भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!, हीच दोन प्रमुख कारणे दिसतायेत. बाकी मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाला फारशी संधी नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जे थोडेफार राजकीय अस्तित्व उरले आहे, ते जिल्हा परिषदांमध्ये, निवडक कारखान्यांमध्येच!!