Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार
मराठा समाज संपूर्ण देशात विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच करोडो समाजबांधवांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. गुरुवारीते आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते. हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायदेवता गोरगरिबांसाठी काम करते. देशात लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.