Supriya Sule’s : भारताच्या भूमिकेची जागतिक स्तरावर ठाम मांडणी; शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात अपप्रचार सुरु केला. याला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदार आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले.