Shashi Tharoor : खर्गेंच्या टिप्पणीनंतर मग थरूर यांनीही चांगलाच टोला लगावला, म्हटले…
सध्या काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नसल्याचेच दिसत आहे. कारण, तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील अलिकडच्या तणावातून हेच सूचित होते. खरंतर, खर्गे यांनी थरूर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की काही लोकांसाठी मोदी आधी येतात आणि देश नंतर.