S Jaishankar : एस. जयशंकर यांचं वक्तव्य : शेजारी देशांशी संबंध कायम ठेवणं सोपं नसतं, पण भारताने परिपक्वता दाखवली
भारतानं आपल्या शेजारी देशांशी कसे संबंध ठेवावेत, यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की शेजारी देशांशी नेहमीच सुलभ संबंध ठेवता येतील, अशी अपेक्षा नको. पण भारतानं परिपक्व धोरण तयार केलं आहे, ज्यामुळे सरकारं बदलली तरी संबंध बिघडत नाहीत.