S Jaishankar : एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे काही म्हटले की, पाकिस्तान चवताळला!
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लंडनच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर नेहमीच भारताच्या शत्रू राष्ट्रावर शाब्दिक हल्ला करत राहतात. पुन्हा एकदा त्याचा आक्रमक दृष्टिकोन दिसून आला. बुधवारी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक-टँकच्या सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले होते की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला काश्मीरचा चोरलेला भाग परत केल्यानंतरच काश्मीर वाद सोडवला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे.