• Download App
    S Jaishankar एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे काही म्हटले की, पाकिस्तान चवताळला!

    S Jaishankar

    ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी चॅथम हाऊस येथे आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे विधान


    विशेष प्रतिनिधी

    लंडन: S Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लंडनच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर नेहमीच भारताच्या शत्रू राष्ट्रावर शाब्दिक हल्ला करत राहतात. पुन्हा एकदा त्याचा आक्रमक दृष्टिकोन दिसून आला. बुधवारी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक-टँकच्या सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले होते की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला काश्मीरचा चोरलेला भाग परत केल्यानंतरच काश्मीर वाद सोडवला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे.S Jaishankar

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांच्या वक्तव्याचे खंडण केले आणि भारताने व्यापलेला काश्मीरचा भाग रिकामा करण्यास सांगितले.



    खान म्हणाले, “५ मार्च रोजी लंडनमधील चॅथम हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरबाबत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले विधान आम्ही नाकारतो. ते म्हणाले, “आझाद जम्मू आणि काश्मीरबद्दल निराधार दावे करण्याऐवजी, भारताने गेल्या ७७ वर्षांपासून व्यापलेल्या जम्मू आणि काश्मीरचा एक मोठा भाग रिकामा करावा.”

    ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी चॅथम हाऊस येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हटले होते की, कलम ३७० हटवणे हे पहिले पाऊल होते, काश्मीरमध्ये विकास, आर्थिक घडामोडी आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे हे दुसरे पाऊल होते आणि खूप जास्त मतदारांसह निवडणुका आयोजित करणे हे तिसरे पाऊल होते. काश्मीर प्रश्नाच्या “उपाय” बद्दल एका प्रश्नाचे उत्तर देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की, “मला वाटते की आपण ज्याची वाट पाहत आहोत ती म्हणजे पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेला काश्मीरचा चोरीला गेलेल्या भागाची परतफेड. जेव्हा हे घडेल तेव्हा मी तुम्हाला खात्री देतो की काश्मीर प्रश्न सुटेल. भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताच अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील.

    S Jaishankar said something about Kashmir in London that made Pakistan angry

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Income Tax : ₹10 लाखांपर्यंत रोख व्यवहारांवर पॅन आवश्यक नाही; हॉटेल बिलाची मर्यादाही ₹1 लाख; 1 एप्रिलपासून लागू होतील नवीन नियम

    Yogi Adityanath : योगी म्हणाले- बाबरी ढाचा प्रलयाच्या दिवसापर्यंत बनणार नाही; जो कायदा मोडेल त्याला नरक मिळेल

    Manipur Violence : मणिपूरच्या उखरुलमध्ये पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद; दंगलखोरांनी 25 घरे आणि चार सरकारी निवासस्थाने जाळली