राहुल गांधींनी संघाचा द्वेष नाही करायचा, तर दुसरे करायचे तरी काय??
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.
चीन बलाढ्य आहे. त्यांच्याशी कसे लढायचे??, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कधी केला नव्हता. पण राहुल गांधींनी मात्र तिकीट त्यांच्यावरच फाडले.
बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आता शिखांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल वाराणसी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतात शिखाला पगडी आणि कडा घालण्याचा अधिकार आहे का, यावर हा लढा आहे.”
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) ची बैठक २४ सप्टेंबर रोजी पाटणा येथे झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते. ही बैठक सुमारे साडेचार तास चालली.
बिहार निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षाने बुधवारी पाटणा येथे “अति पिछडा न्याय संकल्प योजना” सुरू केली. राहुल गांधी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी आणि प्रमुख डावे नेते उपस्थित होते.
सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणूक चौकीदार जागा राहिला, चोरी पाहत राहिला आणि चोरांना वाचवले.” त्यांनी ३७ सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले: “पहाटे ४ वाजता उठला, ३६ सेकंदात दोन मतदारांना हटवले, नंतर पुन्हा झोपला – अशा प्रकारे मतांची चोरी होते!”
कर्नाटकमधील अलंद मतदारसंघातील ६,०१८ मतदार वगळण्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून चुकीच्या अर्जांच्या आधारे एकाही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले गेलेले नाही
विशेष प्रतिनिधी पुणे : Rahul Gandhi in the press conference : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपा मत चोरी करून सत्तेत […]
राहुल गांधींचा Vote chori चा “हायड्रोजन बॉम्ब” आला, पण कोर्टात जायला घाबरला!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली.
सोमवारी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला. राहुल गांधी गुरुदासपूरच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेले होते. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या गावांकडे जाताच एसपी जुगराज सिंह यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना थांबवले. एसपींनी राहुल गांधींना सांगितले की पुढे पाकिस्तानची सीमा आहे आणि कुंपण तुटलेले आहे.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आणि म्हटले की, त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध “आक्षेपार्ह आणि अपमानास्पद” भाषा वापरण्याऐवजी “मतचोरीच्या” आरोपांची चौकशी करायला हवी होती.
विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. या वेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
विशेष प्रतिनिधी मुंबई : VoteChori : वोटचोरीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने काढलेल्या पत्रकात काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा दिला आहे. या […]
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधी हे स्वतःच्या सुरक्षित बाबत गंभीर नसल्याची तक्रार सीआरपीएफने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे […]
केंद्रातले मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उंगल्या करायला गेले, पण साधी INDI आघाडीच्या खासदारांची एकजूट नाही टिकवू शकले!!, अशी राहुल गांधींच्या राजकीय कर्तृत्वाची आज पुन्हा एकदा नोंद झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI नुसती हरलीच नाही तर फुटली सुद्धा. कारण काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांची अपेक्षित असलेली 324 मते बी. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. त्यांना फक्त 300 मते मिळू शकली. NDA आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.
राहुल गांधींचे नाव न घेता, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जर एखाद्या पक्षाच्या नेत्याला वादविवाद किंवा चर्चेत रस नसेल आणि तो फक्त राजकीय नाटक करू इच्छित असेल, तर सरकारला नाही तर विरोधकांना त्रास होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. ते शुक्रवारी गुवाहाटीमध्ये म्हणाले- बिहारमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केली. त्यांच्या घाणेरड्या प्रयत्नांवरून मला कळते की त्यांना जनतेचा पाठिंबा नाही.
जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.
बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.
कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!! बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.