Rahul Gandhi : राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचा ११३ वेळा भंग! सीआरपीएफकडून खर्गेंना इशारा, ‘यलो बुक’चे पालन करावेच लागेल
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.