Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटेनात, मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावर कर्नाटकातील मंत्र्याचा सवाल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. पण हे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच तयार झालेल्या मतदार यादीतील कथित फेरफारांवर आता आक्षेप घेणाऱ्या पक्षाच्या भूमिकेवर कर्नाटकाचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.