पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले; पण 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले, पण तिथे जाऊन पेटवा पेटवी करण्यापेक्षा 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले. तिथे त्यांनी जाहीर सभेबरोबरच निवडक नागरिकांशी संवाद आणि रोड शो चे कार्यक्रम देखील केले. पण त्यांनी कुठेही पेटवा पेटवीचे भाषण केले नाही. उलट मी आणि केंद्र सरकार तुमच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही देऊन ते मणिपूरच्या बाहेर पडले.