• Download App
    mumbai | The Focus India

    mumbai

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवरील ईडीची कारवाई पूर्ण; 3 दिवसांत 35 ठिकाणी छापे; 3000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

    अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे रविवारी पूर्ण झाले. ही कारवाई २४ जुलै रोजी सुरू झाली आणि तीन दिवस चालली. या छाप्यात सुमारे ५० कंपन्या सहभागी आहेत. २५ हून अधिक लोकांची चौकशीही करण्यात आली आहे.

    Read more

    Mumbai Airport Terminal 1 : मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 बंद होणार; 10 कोटी प्रवासी नवी मुंबईकडे वळणार

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे कडाडले- आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे; खासदार दुबेंना धमकी- मुंबईत येऊन दाखवा, समंदर में डुबो-डुबो कर मारेंगे!!

    त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    Read more

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके

    यूपीमधील धर्मांतराचा सूत्रधार छांगूर बाबा ऊर्फ जलालुद्दीन याच्या लपण्याच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून बलरामपूरमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

    Read more

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

    Read more

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

    आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती. आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे या वेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

    Read more

    Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधानभवनाच्या गेटवरच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गाडी अंगावर घालण्याचा आरोप केला. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा प्रकार घडल्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती.

    Read more

    Agra Protest : आग्र्यात उद्धव-राज ठाकरे यांचे पुतळे जाळले; हिंदी भाषकांवरील हल्ल्यांविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

    राज्यात हिंदी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आग्रा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फतेहाबाद रोड बसई मंडी येथे निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा पुतळा जाळून निषेध करत राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आणि हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा निषेध केला.

    Read more

    Tahawwur Rana : 26/11 हल्ल्याच्या वेळी दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता; NIA चौकशीदरम्यान दिली कबुली

    २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता. एनआयएने केलेल्या चौकशीत त्याने हे कबूल केले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राणाने कबूल केले आहे की, तो पाकिस्तानी सैन्याचा एजंट आहे.

    Read more

    Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान

    गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Raj Thackeray  and Uddhav Thackeray : 5 तारखेला वाजत-गाजत गुलाल उधळत या; राज-उद्धव ठाकरेंचे संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याचे आवाहन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.

    Read more

    Manoj Jarange : आता वाशी-बिशी नाही, थेट मंत्रालयावर धडकणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत मोर्चा

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.

    Read more

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- पालिकेच्या निवडणुका नसत्या तर इतका विरोध झाला नसता; उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच!

    पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

    Read more

    Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन

    हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Mumbai : मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर अटक

    मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी नातू, मेहुणा आणि रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे राहुल शेवाळे (नातू), बाबा साहेब गायकवाड आणि संजय कद्रेशिम अशी आहेत. त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिला जिवंत कचराकुंडीत फेकण्यात आले.

    Read more

    Mumbai Delhi Airports : मुंबई-दिल्लीसारख्या विमानतळांवर मोठ्या सुरक्षा त्रुटी; DGCAने म्हटले- धावपट्टीवरील मार्किंग अस्पष्ट

    १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देशभरातील विमानतळांवर तपास पथके पाठवत आहे. तपासानंतर असे समोर आले की, मुंबई आणि दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवर मोठ्या सुरक्षा त्रुटी आहेत.

    Read more

    Prakash Ambedkar : 76 लाख वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात मांडली बाजू, 25 जूनला निकाल

    मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

    Read more

    Amit Shah : खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका

    केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे,” असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्यांनी शहरासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली.

    Read more

    Mumbai : मुंबईची झाली तुंबई! रेड अलर्ट जारी, बस, लोकल आणि विमान सेवांवर परिणाम

    पावसाळा सुरू झाला असून मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री उशिरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर दिसून येतो. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.

    Read more

    Mumbai : मोठी बातमी! ११-१२ एप्रिल रोजी मुंबईला जाणाऱ्या तब्बल ३३४ रेल्वे रद्द

    पश्चिम रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे की, माहीम खाडी पुलाच्या पुनर्बांधणीमुळे ११-१२ एप्रिल रोजी एकूण ५१९ गाड्या प्रभावित होतील. पश्चिम रेल्वे ११-१२ एप्रिल आणि १२-१३ एप्रिलच्या रात्री पुलाची दुरुस्ती करेल.

    Read more

    Mumbai : मुंबईत युट्यूबर्स अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा, समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल; पालक आणि महिलांबद्दल केली अश्लील टिप्पणी

    पालक आणि महिलांवर अश्लील टिप्पण्या केल्याबद्दल युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    मुंबईत रंगल्या भेटीगाठी आणि झाले नाश्तापाणी; दिल्लीत केली डिनर डिप्लोमसी!!

    मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.

    Read more

    Mumbai : मुंबईत CBIचा छापा; लाच प्रकरणात 2 IRSसह 7 अधिकारी अटकेत, 40 कोटींच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Mumbai  कथित लाचखोरीच्या रॅकेटप्रकरणी सीबीआयने बुधवारी मुंबईत छापे टाकून दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली. सहविकास आयुक्त सीपीएस चौहान आणि […]

    Read more

    Mumbai : महाराष्ट्रात 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मुंबईच्या आझाद मैदानात जय्यत तयारी

    हा कार्यक्रम इतका भव्य असेल की त्यात 40 हजार लोक जमतील असा अंदाज आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : Mumbai महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नावावर अजूनही सस्पेंस कायम […]

    Read more