Modi government : कृषी क्षेत्रातील अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करून मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या खिशाला थेट दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक वस्तूंवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.