Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- मोठ्या नेटवर्कने संतोष भैय्याचा जीव घेतला; खंडणी, अपहरण, बलात्कार, चोरीसाठी वेगळ्या टीम; सर्वांना सांभाळणारा एक
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले.