• Download App
    manoj jarange | The Focus India

    manoj jarange

    Anjali Damaniya : लक्ष्मण हाकेंनी ‘मौन आंदोलन’ 12 महिने 13 काळ करावे; अंजली दमानियांचा टोला

    मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत महायुती सरकारची चांगलीच कोंडी केली होती. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या व आरक्षणासंदर्भातील जीआर काढला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. बेकायदा मागणीसाठी हे आंदोलन होते तसेच मुख्यमंत्री हतबल असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसेच आता त्यांनी मौन आंदोलन देखील सुरू केले आहे. याव

    Read more

    Eknath Shinde : शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगितले होते; जरांगेंच्या उपोषणानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात आजचा निर्णय हा देखील मोठा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी याआधी जाहीर सभेत शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार एसईबीसीमधून दिले होते. ते टिकवले देखील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

    Read more

    Manoj Jarange : आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस; भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर

    संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी मनोज जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

    Read more

    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्याचा मनोज जरांगेंचा आग्रह, पण अखेरीस विखे पाटलांच्या हस्ते सोडले उपोषण!! “रहस्य” काय??

    मराठा समाजाला फडणवीस सरकारने ओबीसी मधून आरक्षण दिले नाही त्याचबरोबर सरसकट सगेसोयरे अंमलबजावणी देखील केली नाही. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर लागू करण्याची मागणी आणि अन्य काही मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीतच उपोषण सोडण्याचा आग्रह धरला. पण हे तीनही नेते मुंबईच्या बाहेर आहेत, असे कारण सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडायला लावले. अखेरीस विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.

    Read more

    Maratha reservation : मराठा आंदोलनाला यश, मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण

    विशेष प्रतिनिधी   मुंबई : Maratha reservation :  मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केली मसुद्याची कसून तपासणी, आंदोलन मागे घेण्याची घोषणा

      मुंबई : Manoj Jarange :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज […]

    Read more

    ओबीसीतून मराठा आरक्षण नाही, सग्यासोयऱ्यांची सरसकट अंमलबजावणीही नाही, फक्त हैदराबाद + सातारा गॅझेटियर निर्णय मान्य; तरीही जरांगेंचा विजय उत्सव!!; कारण काय??

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू केलेले आंदोलन मनोज जरांगे यांनी मागे घेतले. फडणवीस सरकारने मनोज जरांगेंच्या हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याच्या मागण्या मान्य केल्या.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी 6 मुद्द्यांचा मसुदा सादर; ‘जीआर’ काढण्याचीही तयारी !

    विशेष प्रतिनिधी   मुंबई : Maratha reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने नवीन शासन निर्णय (जीआर) […]

    Read more

    मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टाचा प्रचंड संताप; जे सुरू आहे ते बेकायदा असल्याचा हायकोर्टाचा ठपका!!

    मनोज जरांगे यांनी आंदोलनात सगळ्या कायद्यांचे उल्लंघन केले. याविषयी मुंबई हायकोर्टाने आज प्रचंड संताप व्यक्त केला मुंबईत जे सुरू आहे ते बेकायदा सुरू आहे

    Read more

    Manoj Jarange : हुल्लडबाज आंदोलक की सरकार हे समजून घ्या, मनोज जरांगे यांचे पत्रकारांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी   मुंबई : Manoj Jarange : पत्रकारांनी समजून घ्यावे की हुल्लडबाज आंदोलक आहेत की, सरकार आहे. हे समजून घ्या. मीडियाने मुख्यमंत्र्याला बोलले पाहिजे, […]

    Read more

    Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्या अंगावरून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात!!

    मुंबईतले मराठा आरक्षण आंदोलन हाताबाहेर गेले. त्या आंदोलनात महिला पत्रकारांची छेड काढली. फक्त आझाद मैदानात 5000 लोकांना आंदोलन करायची परवानगी दिली असताना सगळ्या मुंबईला भेटीला धरले. न्यायमूर्तींच्याही गाड्या अडविल्या. आंदोलनामुळे मुंबईत अराजक निर्माण झाले. त्यामुळे मुंबई पुढच्या 24 तासांत खाली करा आंदोलन फक्त आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या वकिलांकडून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात झाली.

    Read more

    मुंबईत अराजक; मनोज जरांगेंच्या आंदोलकांचा मुंबई हायकोर्टाला घेराव; न्यायमूर्तींच्या गाड्या पण अडविल्या!!; मुंबईत आता कुणालाही यावेळी येऊ नका; हायकोर्टाचे आदेश

    मनोज जरांगे यांच्या आंदोलकांनी मुंबईत अराजक माजवले असून मुंबई हायकोर्टाला घेराव घालण्यापर्यंत आणि न्यायमूर्तींच्या गाड्या अडवून धरण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

    Read more

    Prakash Shendge : सुप्रिया सुळे जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? शरद पवारांचाही पाठिंबा आहे का? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा संतप्त सवाल

    आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे त्या जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली, यावरून शेंडगे यांनी टीका केली आहे.

    Read more

    Supriya Sule : मराठा आंदोलनात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या; मनोज जरांगेंना भेटून परतताना आंदोलकांचा घेराव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Supriya Sule राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!

    सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

    Read more

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीन टार्गेट्स; पण ती यशवंत सूत्राच्या विरोधातलीच!!

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हत्यार घेऊन मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले असले आणि त्यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाचा एल्गार केला असला तरी जरांगे यांच्या आंदोलनाची वेगवेगळी वळणे आणि वळसे पाहता, तीन टार्गेट्स असल्याचे लक्षात येते. मराठा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आवरणाखाली राजकीय आरक्षण साध्य करून घेणे, देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र सोपविणे ही तीन टार्गेट्स आहेत. शरद पवारांच्या राजकीय भूमिका बदलांशी अनुकूल ठरणारी टार्गेट्स जरांगेंना त्यांनी दिली आहेत.

    Read more

    Maratha reservation : मराठा आरक्षण आंदोलन; शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.

    Read more

    Manoj Jarange : रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे संतप्त; ‘कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुंबई पोलिसांमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली असली, तरी रोज नवीन अर्ज दाखल करण्याची अट घातली आहे. या अटीमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी थेट पोलिसांना परवानगीसाठी अर्ज करताना काही कठोर प्रश्न विचारले आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका; म्हणाले – दोन समाज झुंजवणे योग्य नाही, संविधानाच्या चौकटीतच तोडगा काढावा लागणार

    दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Manoj Jarange : हैद्राबाद गॅझेट लागू करण्यास न्या. शिंदे समितीची तत्वतः मान्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई :Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला आज दुसरा दिवस आहे. 27 ऑगस्ट […]

    Read more

    Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.

    Read more

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    उच्च न्यायालयाने मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना पाेलीसांच्या परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदाेलन करण्यास परवानगी नाकारली हाेती.

    Read more

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक

    मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना हमीपत्र; कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली 20 आश्वासने

    मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.

    Read more