• Download App
    Maharashtra Politics | The Focus India

    Maharashtra Politics

    Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले- अजित पवारांवर माझा ठाम विश्वास; राजीनाम्याची चर्चा फेटाळली

    विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सिन्नर येथील आपला मेळावा रद्दबातल केला आहे.

    Read more

    Uddhav Thackeray’ : उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात; स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपात दिसतील – गिरीश महाजन

    उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    Khadse : एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना थेट आव्हान; प्रॉपर्टी, मुलाच्या मृत्यूची चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा!

    जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आता खडसेंनी महाजनांना तीन मोठी आव्हानं दिली आहेत.

    Read more

    Ajit Pawar : मंत्रिमंडळात फेरबदलावर अजित पवार म्हणाले- हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार; कोकाटे-सूरज चव्हाणवरही केले भाष्य

    राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे?

    Read more

    Vijay Ghadge : अजित दादांचा घाडगेंना शब्द: माणिकराव कोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार

    अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले.

    Read more

    Ajit Pawar : ‘आता तिजा होऊ देणार नाही’, कृषिमंत्री कोकाटेंवर अजित पवारांचे कारवाईचे स्पष्ट संकेत

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील ऑनलाईन रमी प्रकरणी लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, याआधीही त्यांनी कोकाटेंना योग्य इशारा दिला होता की ‘इजा-बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका’. मात्र आता पुन्हा एकदा प्रकरण घडल्याने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.

    Read more

    Bawankule : हनी ट्रॅप, पेनड्राइव्ह या सर्व शिळ्या भाकरी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला

    भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनी ट्रॅपच्या मुद्यावरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. हनी ट्रॅप व पेन ड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. विरोधक मीडियातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढवून, चढवून बोलतात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना आपली उंची पाहून बोलण्याचाही उपरोधिक सल्ला दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला.

    Read more

    NCP Tatkare : हनीट्रॅपबाबत वडेट्टीवारांचे वक्तव्य मूर्खपणाचे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पलटवार

    राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.

    Read more

    Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही

    विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    Read more

    Fadnavis : एखाद्याला भेटले म्हणजे युतीसाठी भेटणे नाही; CM फडणवीस यांचे उद्धव ठाकरे भेटीवर स्पष्टीकरण

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली की राज ठाकरेंसोबत चर्चा करू

    अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे कडाडले- आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे; खासदार दुबेंना धमकी- मुंबईत येऊन दाखवा, समंदर में डुबो-डुबो कर मारेंगे!!

    त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

    Read more

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

    Read more

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी अशा हल्ल्याचा निषेध करतो. त्यांच्यावर जो हल्ला झाला तो आम्हाला मान्य नाही. राहिला प्रश्न दीपक काटेचा तर अडीच वर्षांपूर्वी काटेच्या प्रवेशावेळी मी बोललो की हा चांगले काम करेल यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोकं आहोत. कुणी पक्षात येत असेल त्यावेळी आपण हे बोलत असतो, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

    आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती. आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे या वेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

    Read more

    Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधानभवनाच्या गेटवरच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गाडी अंगावर घालण्याचा आरोप केला. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा प्रकार घडल्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती.

    Read more

    Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!

    शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यानिमित्ताने आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. निरोपाच्या भाषणावेळी त्यांनी संघातील सुरुवात, शिवसेनेतील वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच “मी पुन्हा येईन” आणि ” मी मार खाऊन घरी परतरणारा नाही” असे म्हणत लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.

    Read more

    Shashikant Shinde : प्रदेशाध्यक्ष झाल्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया- आर आर पाटलांसारखे संधीचे सोने करणार

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला आगामी रणनिती सांगितली.

    Read more

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाचा निकाल 3 महिन्यांत; सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

    सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक

    विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.

    Read more

    Eknath Shinde : मंत्री-आमदारांच्या वर्तनामुळे एकनाथ शिंदे नाराज; स्पष्ट इशारा- जबाबरीने वागा अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल

    सत्ताधारी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कानउघाडणी केली आहे. काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावे लागले. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा गंभीर इशारा शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- विजयी मेळावा मराठीपुरताच होता, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर

    राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.

    Read more

    Akkalkot Attack : अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया- माझ्या हत्येचाच कट होता, हल्ल्यामागे सरकारच जबाबदार

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

    Read more

    Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- जनसुरक्षा विधेयक सर्वानुमते मंजूर; ते संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात

    महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे संविधानाला न मानणाऱ्या शक्ती विरोधात कारवाई करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वांनुमते ते मंजूर करण्यात आले असून कायदा न वाजता यावर टीका करणाऱ्यांनी एकदा कायदा वाचावा. कायदा समजून घेतल्यानंतर कोणीही या विधेयकावर टीका करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

    Read more