नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय
नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.