• Download App
    devendra fadnavis | The Focus India

    devendra fadnavis

    Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरे म्हणाले- देवेंद्रजींनी जे सोसले ते अन्य कोणीही सोसलेले नाही, ओबीसींवर कोणतीही गदा येणार नाही!

    ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर हल्ले असतील किंवा टार्गेट केले गेले असेल, पण मी जबाबदारीने सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो, असे आश्वासन गोरे यांनी दिले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन- मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही, तुम्ही मागत रहा, शक्य तेवढे देत राहू

    पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावे, आम्ही शक्य तेवढे देत राहू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

    Read more

    Minister Shivendra Raje Bhosale : मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले- देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कधी समाजाचा वापर केला नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

    Read more

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही

    मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे

    Read more

    केलेल्या कामाच्या फडणवीसांच्या जाहिराती; पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी!!

    केलेल्या कामाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती झाल्या. त्यामुळे पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले. ते मुंबईतून आंतरवली सराटीत गेले. त्यामुळे अनेकांचे पापड मोडले. कारण मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधायचे अनेकांची कारस्थाने उधळली गेली.

    Read more

    Eknath Shinde : मराठा आंदोलनाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदे म्हणाले – आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, विकास महत्त्वाचा

    राज्यातील राजकारणात सध्या ‘देवाभाऊ’ या नावाने एक नवीन जाहिरात मोहीम सुरू झाली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळल्याबद्दल श्रेय दिले जात आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढल्याबद्दल मुंबईत विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना दिसत आहेत आणि ‘देवाभाऊ’ असे लिहिले आहे. या मोहिमेमागे कोण आहे, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी, राजकीय वर्तुळात ही मोहीम मराठा आरक्षणाशी जोडली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    Read more

    Fadnavis : फडणवीसांनी अमेरिकेला ठणकावले- हा नवा भारत, मोदीजींचा भारत, परराष्ट्र धोरण आम्ही ठरवतो, कोणीही हुकूम देऊ शकत नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही म्हणो किंवा न म्हणो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण स्वतः बनवतो. ज्यावर इतर कोणताही देश हे धोरण लादू शकत नाही. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. त्यानंतर फडणवीस यांचे हे विधान समोर आले आहे.

    Read more

    Raje Mudhoji Bhosale : मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावे, ओबीसीतून नको; राजे मुधोजी भोसले यांची मागणी

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले व महायुती सरकारने आरक्षणाबाबतचा शासन निर्णय घेतला. त्यानुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis: मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही; खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरविषयी वेगवेगळे मतमतांतरे व्यक्त केली जात असताना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी काढलेला जीआर सरसकटचा नाही. या प्रकरणी जे खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. या प्रकरणी कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची सडकून टीका- पवार ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवले!

    मनोज जरांगे यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केल्या असून जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. तसेच मराठा आंदोलक देखील मुंबईतून माघारी फिरत आहेत. अशात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता हल्लाबोल सुरू केला असून पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

    Read more

    ना फडणवीसांचा राजीनामा, ना केंद्राच्या गळ्यात लोढणे, ना महाराष्ट्राचे विशेष अधिवेशन; जरांगेंच्या आंदोलनात वाया गेले पवार फॅमिलीचे राजकीय इंधन!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांच्या विशिष्ट मागण्या मान्य करून मराठा आरक्षण हैदराबाद आणि सातारा गॅझेट नुसार लागू करण्याचा निर्णय घेतला

    Read more

    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्याचा मनोज जरांगेंचा आग्रह, पण अखेरीस विखे पाटलांच्या हस्ते सोडले उपोषण!! “रहस्य” काय??

    मराठा समाजाला फडणवीस सरकारने ओबीसी मधून आरक्षण दिले नाही त्याचबरोबर सरसकट सगेसोयरे अंमलबजावणी देखील केली नाही. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर लागू करण्याची मागणी आणि अन्य काही मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीतच उपोषण सोडण्याचा आग्रह धरला. पण हे तीनही नेते मुंबईच्या बाहेर आहेत, असे कारण सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडायला लावले. अखेरीस विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.

    Read more

    Shinde Committee : मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचे तत्त्वतः मान्य; शिंदे समितीचा जरांगेंना शब्द

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. असे करून फडणवीसांनी राज्याचा अपमान केला, असे ते म्हणाले. दरम्यान, न्या. संदीप शिंदे समितीने यावेळी मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे तत्वतः मान्य केले. हा मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा असल्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका; म्हणाले – दोन समाज झुंजवणे योग्य नाही, संविधानाच्या चौकटीतच तोडगा काढावा लागणार

    दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!

    मराठा आरक्षण आंदोलनावर काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणे लावण्याचा त्यांचा डाव आहे. मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान त्यांनी रचलेय.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.

    Read more

    अजितदादांचा विरोध मोडून मुख्यमंत्री फडणवीसांची थोपटेंच्या राजगड साखर कारखान्याला मदत; पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला लागोपाठ दुसरा धक्का!!

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.

    Read more

    Rohit Pawar : मंत्री शिरसाटांच्या अडचणीत भर; 12 हजार पानांचे सुटकेस भरून पुरावे रोहित पवारांकडून सादर

    सिडकोतील तब्बल ५ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुरावे द्या” असे खुले आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत रोहित पवार सोमवारी पत्रकार परिषदेत तब्बल १२ हजार पानांचे दस्तऐवज घेऊन मैदानात उतरले. या पुराव्यांच्या बॅगमुळे शिरसाट यांच्यावरील संकट अधिक गडद झाले आहे.

    Read more

    Ajit Pawar : अजितदादा म्हणाले- शिंदेंच्या खात्यावर सीएम नाराज नाहीत; 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्यावर नाराज असल्याचा दावा केला जात आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची माहिती धांदात खोटी आहे, असे ते म्हणाले.

    Read more

    महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

    विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून

    Read more

    Fadnavis पृथ्वीराज चव्हाण कुटुंबातील ९ मतदारांची दुबार नावे; खरे व्होट चोर समोर, राहुल यांनी उत्तर द्यावे- मुख्यमंत्री फडणवीस

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.

    Read more

    शक्ती संवादातले चिंतन महिला विषयक धोरणात परावर्तित करायची ग्वाही मुख्यमंत्री देतात तेव्हा…

    राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन- अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा; माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? बुडणारी शहरं वाचवा!

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील

    आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    Devendra Fadnavis : ठाकरेंनी राजकीयकरण केल्याने जनतेने नाकारले; बेस्ट निवडणूक निकालावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

    Read more