15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा चव्हाण + पवारांचा निर्णय 1988 पासून लागू; पण 2025 मध्ये आव्हाड + राऊतांनी उकरून काढला वाद!!
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
मतदार यादीतील अनियमिततेवरून त्यांच्याच पक्षावर टीका करणाऱ्या विधानानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी सोमवारी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांचे भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याच्या विधानाचे खंडन केले आहे. शुक्रवारी संसदेच्या आवारात माध्यमांनी थरूर यांना विचारले की, भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले – नाही, ते अजिबात नाही, सर्वांना माहिती आहे.
शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १० वा दिवस होता. बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत सदस्यांना रोखण्यासाठी कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या ९ दिवसांत दुसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. शुक्रवारी संसदेबाहेर पडताना राहुल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग वाचणार नाही.
विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.
: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपेरशन सिंदूर’ हे सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता’ असे वादग्रस्त विधान केले होते.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर तीव्र चर्चा रंगली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक होत आहे. आज लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असताना विरोधकांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे श्रीकांत शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेण्याचा प्रश्न टाळला. त्यांनी माध्यमांना सांगितले, ‘मौनव्रत…मौनव्रत’. खरं तर, यापूर्वी अशी बातमी होती की ते संसदेच्या चर्चेत भाग घेऊ शकतात.
राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 24 वेळा बडबड म्हणून काँग्रेस सकट विरोधकांना संसदेत आली उबळ!!, असे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत घडले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी सर्व पक्षांची बैठक झाली. या दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्य मागितले. सर्व पक्षांनी आपले विचार मांडले.
आम आदमी पक्षाने (आप) शुक्रवारी इंडिया ब्लॉकपासून स्वतःला दूर केले. खासदार संजय सिंह म्हणाले की, एएओ आता विरोधी आघाडीचा भाग नाही. त्यांनी आघाडीचे नेतृत्व करण्यात काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.
बैल गेला अन् झोपा केला, या मराठी म्हणीचा प्रत्यय आज आला. महाराष्ट्र विधानसभेने अख्खे जनसुरक्षा विधेयक संमत केले, त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी त्याच्या विरोधात थोडीफार भाषणे केली, पण त्याला कसून विरोध का केला नाही??
मंगळवारी दुपारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयात आत्मसमर्पण केले. ५ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांनी राहुल यांना २०,००० रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राहुल यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने स्वीकारला. राहुल सुमारे ३० मिनिटे न्यायालयात थांबले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका लेखात लिहिले आहे की, आणीबाणी केवळ भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून लक्षात ठेवू नये, तर त्यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी नसबंदी मोहिमेला मनमानी आणि क्रूर निर्णय म्हटले.
आम आदमी पक्ष (आप) बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी अहमदाबादमध्ये सांगितले की, इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती. आता आमची कोणाशीही आघाडी नाही.
काँग्रेस केंद्रात सत्तेवर आली, तर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालू, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव कर्नाटक मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले.
काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, जर केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, तर आरएसएसवर बंदी घातली जाईल. प्रियांक यांनी आरएसएसवर धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात काम करण्याचा आरोपही केला.
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.