CM Fadnavis : CM फडणवीसांची स्पष्टोक्ती- शक्तिपीठ करायचा आहे, पण लादायचा नाही; शेतकऱ्यांची भूमिका समजून घेण्याचा आग्रह
राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केली. सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढले पाऊल उचलेल, असे ते म्हणालेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सरकार कोणत्याही स्थितीत हा आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार हे स्पष्ट झाले आहे.