• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- पंतप्रधानांना जेवढी शिवीगाळ कराल तितके कमळ फुलेल; राहुल यांना थोडीही लाज असेल तर मोदीजींची माफी मागावी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. ते शुक्रवारी गुवाहाटीमध्ये म्हणाले- बिहारमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केली. त्यांच्या घाणेरड्या प्रयत्नांवरून मला कळते की त्यांना जनतेचा पाठिंबा नाही.

    Read more

    Mahua Moitra : महुआ मोईत्रा पुन्हा बरळल्या, अमित शहांचे डोके कापण्याची भाषा, भाजपचा पलटवार- तृणमूलची हिंसक संस्कृती

    पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. शुक्रवारी नादिया जिल्ह्यातील घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले की सीमा सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे. जर घुसखोरी होत असेल तर अमित शहा यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे.

    Read more

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.

    Read more

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार

    बिहारमधील एनडीए आघाडीच्या जागावाटपाबाबतचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली भेटीनंतर, विधानसभा निवडणुकीतील जागांवर आघाडीतील पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले आहे.

    Read more

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले- भाजप आणि संघ यांच्यात कोणताही वाद नाही. आमचे फक्त भाजप सरकारशीच नाही, तर सर्व सरकारांशी चांगले संबंध आहेत.सरकारमध्ये निर्णय घेण्याच्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, सरकारमध्ये सर्व काही संघ ठरवतो असे म्हणणे चुकीचे आहे. आपण सल्ला देऊ शकतो, पण निर्णय ते घेतात. जर आपण निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागला नसता.

    Read more

    BJP States : भाजपशासित राज्यांनी म्हटले- न्यायालय विधेयकांना मान्यता देऊ शकत नाही, हा फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचा अधिकार

    मंगळवारी, सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी अंतिम मुदत देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा आणि पुद्दुचेरी या भाजपशासित राज्यांमधील वकिलांनी सांगितले की, न्यायालयाला विधेयकांना मंजुरी देण्याचा अधिकार नाही.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भाजपची विनंती- मुंबईतील मोर्चा पुढे ढकला; गणेशोत्सवात विघ्न आणू नये- मुख्यमंत्री फडणवीस

    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. 27 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यात आता गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. अशात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती करण्यात आली आहे.

    Read more

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे?” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.

    Read more

    Congress : काँग्रेस नेत्याने RSSला भारतीय तालिबान म्हटले; भाजपचा पलटवार- काँग्रेसला PFI-सिमी संघटना आवडतात

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी आरएसएसला तालिबान म्हटले आहे, या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने म्हटले आहे की काँग्रेस प्रत्येक राष्ट्रवादी संघटनेचा गैरवापर करते आणि पीएफआय आणि सिमी सारख्या बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनांवर प्रेम करते.

    Read more

    Praful Patel : प्रफुल्ल पटेल म्हणाले- 2014 मध्येच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेचा हात सोडायचे ठरले होते

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल मोठा खुलासा केला आहे. आमची भाजपसोबत जाण्याची इच्छा खूप आधीपासून होती, इतकेच नाही तर शरद पवार यांची देखील तीच इच्छा होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा आणि भाजपने शिवसेनेचा हात सोडायचे ठरले होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    Ram Madhav : विरोधकांकडून BJP-RSS मध्ये तणावाचा मुद्दा, राम माधव यांनी केले खंडन; मोदींनी लाल किल्ल्यावरून केले RSSचे कौतुक

    भाजप आणि संघ यांच्यातील मतभेदांच्या अटकळींना ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी शनिवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दोन्ही संघटना आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत.

    Read more

    Govind Giri Maharaj : आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित होण्याची भीती; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भाजपच्या आयात संस्कृतीवर टीका

    अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे, तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Sonia Gandhi : भाजपचा काँग्रेसवर पलटवार- भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया मतदार झाल्या; रायबरेलीत एकाच पत्त्यावर 47 मतदार

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करत असताना, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमिल मालवीय यांनी बुधवारी दावा केला की सोनिया गांधी भारतीय नागरिक नसतानाही त्यांचे नाव भारताच्या मतदार यादीत दोनदा समाविष्ट करण्यात आले.

    Read more

    BJP Attacks Uddhav Thackeray : भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल-जितेंद्र आव्हाडांचा हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न मान्य आहे का? सनातनी दहशतवाद हा फेक नरेटिव्ह!

    कथित सनातनी दहशतवादाच्या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून देशात सनातनी दहशतवादाचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? की त्यांनी आव्हाडांपुढेही गुडघे टेकलेत? अशी विचारणा भाजपने या प्रकरणी केली आहे.

    Read more

    Delhi Police : दिल्ली पोलिसांनी बंगालीला बांगलादेशी भाषा म्हटले; TMC खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले- ही चूक नाही, तर भाजपचे षड्यंत्र आहे

    २९ जुलै रोजी बांगला भवनला लिहिलेल्या अधिकृत पत्रात दिल्ली पोलिसांनी बांगला भाषेचे वर्णन बांगलादेशी भाषा असे केले. त्यात लिहिले होते, ‘भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे बांगलादेशी भाषेत आहेत. अशा परिस्थितीत, पुढील तपासासाठी बांगलादेशी राष्ट्रीय भाषेचा अधिकृत अनुवादक उपलब्ध करून द्या.’

    Read more

    Suresh Dhas : बीड तुरुंगात ‘आका’चा स्पेशल फोन सापडला; आमदार सुरेश धस म्हणाले- कॉल डिटेल्स काढले तर सर्व बाहेर येईल

    बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्वकाही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

    Read more

    CM Fadnavis : ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे; CM फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

    काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.

    Read more

    Praniti Shinde ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ संबोधले; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीकेची झोड

    : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपेरशन सिंदूर’ हे सरकारने माध्यमांमध्ये केलेला एक तमाशा होता’ असे वादग्रस्त विधान केले होते.

    Read more

    Bawankule : राहुल गांधींची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे जिवंत उदाहरण; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

    राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

    Read more

    Uddhav Thackeray’ : उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात; स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपात दिसतील – गिरीश महाजन

    उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    Manoj Tiwari : मराठी मुद्द्यावरून मनोज तिवारींचा इशारा- राज ठाकरेंसोबत जाणाऱ्याचे राजकारण संपेल, मराठीची खरी काळजी भाजपलाच

    मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राज्यात रंगत असलेला वाद आता अधिकच तीव्र होत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.

    Read more

    Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही

    विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    Read more

    Modi : मोदी बंगालमध्ये म्हणाले- घुसखोरांवर कारवाई केली जाईल; भाजप कोणताही कट यशस्वी होऊ देणार नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सांगितले- तृणमूल काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी बंगालमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन दिले. यासाठी एक परिसंस्था तयार केली जात आहे. हे राज्य, देश आणि बंगाली संस्कृतीसाठी धोका आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे कडाडले- आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे; खासदार दुबेंना धमकी- मुंबईत येऊन दाखवा, समंदर में डुबो-डुबो कर मारेंगे!!

    त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

    Read more