• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    Rahul Gandhi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा खुलासा- राहुल गांधींनी मंत्री हटवण्यासाठी दबाव टाकला, बरखास्त न केल्यास ट्विटचा इशारा दिला

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. कॅप्टन म्हणाले की, राहुल गांधींनी त्यांच्यावर एका मंत्र्याला बडतर्फ करण्यासाठी दबाव आणला होता. त्यांनी नकार दिल्यावर राहुल गांधी म्हणाले की, जर त्यांनी कारवाई केली नाही, तर मी ट्वीट करून मंत्र्याला बडतर्फ केल्याचे जाहीर करेन. यानंतर कॅप्टनने मंत्र्याला सांगितले, तेव्हा मंत्र्याने 5 मिनिटांत राजीनामा दिला.

    Read more

    Eknath Khadse : एकनाथ खडसेंची स्लीप ऑफ टंग; राष्ट्रवादीच्या सभेत भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन, काँग्रेसने लगावला टोला

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चांगलीच फजिती झाली. भर सभेत भाषण करताना खडसे यांची जीभ घसरली आणि त्यांनी उपस्थितांना चक्क “भाजपला मतदान करा,” असे आवाहन केले. खडसेंच्या या विधानामुळे व्यासपीठावर आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नंतर कार्यकर्त्यांनी आठवण करून देताच खडसेंनी सारवासारव करत “तुतारीलाच मतदान करा,” अशी दुरुस्ती केली. मात्र, तोपर्यंत हे वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय बनले होते.

    Read more

    Manikrao Kokate : सख्खा भाऊ फोडल्याने माणिकराव कोकाटे संतापले- भाजप ‘बाटलेला’ पक्ष, त्यांचे आयुष्य फोडाफोडीतच चालले, शिंदेंवरही टीका

    “भाजपचे आयुष्य केवळ दुसऱ्यांची घरे फोडण्यात चालले आहे. विधानसभेला माझ्या घरातील माणूस फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्याही घरात फूट पाडली. भाजप हा आता पूर्णपणे ‘बाटलेला’ पक्ष झाला असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिन्नरमधील प्रचार सभेत कोकाटे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दावा- संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी; नाशिकमधील वृक्षतोडीलाही केला विरोध

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. भाजपचे मुंह में राम बगल में अदानी, असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी हा शब्द कॉन्ट्रॅक्टरचा प्रतीक झालाय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुंभमेळ्याचे कारण सांगून नाशिकमध्ये वृक्षतोडीचा घाट घातला जातोय. ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातेय, असा आरोपही त्यांनी केला.

    Read more

    BJP Congress : भाजपने म्हटले- राहुल यांची देशात गृहयुद्ध घडवण्याची योजना; काँग्रेसशी संबंधित X खात्यांचे लोकेशन पाकिस्तान-बांगलादेशात

    भाजपने गुरुवारी आरोप केला की, काँग्रेस परदेशी सोशल मीडिया खात्यांद्वारे भारतात गृहयुद्ध भडकावण्याचा कट रचत आहे. ही खाती पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेसह इतर देशांमधून चालवली जात आहेत. राहुल गांधी आणि डाव्या नेत्यांच्या सांगण्यावरून भारताची प्रतिमा खराब केली जात आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती; सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने – चंद्रशेखर बावनकुळे

    देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. यापूर्वीही आम्ही सांगितले होते की शेतकऱ्यांच्या गळ्याशी येत असेल तर सरकार काही निर्णय घेईल म्हणून आम्ही शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. ज्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या घरी जात तगादा लावणार नाही, असे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा तडाखा; म्हणून शरद पवारांचा पक्ष अजितदादांना लागला फोडावा!!

    एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा असा काही तडाखा दिलाय, की त्यामुळे अजितदादांना शरद पवारांचा पक्ष फोडावा लागला. उमेदवार आयात करावे लागले आणि आपल्या पारंपरिक विरोधकांशी तडजोड करावी लागली

    Read more

    Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे

    काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Shinde : मित्रपक्षातून येणाऱ्यांना थांबवा; शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश, दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर नवा पवित्रा

    भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.

    Read more

    कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा!!; भाजपच्या स्वबळाचा राष्ट्रवादीला तोटा!!

    कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा दिला. भाजपच्या स्वबळाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला असा फटका दिला.

    Read more

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.

    Read more

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगवान झाली आहे. भाजप आणि जेडीयूकडे अंदाजे समान मंत्री असतील, प्रत्येकी १६. एलजेपी (आर) कडे दोन मंत्री असतील, तर एचएएम आणि आरएलएसपीकडे प्रत्येकी एक मंत्री असेल.

    Read more

    Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाने मुकुल रॉय यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले; पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत निर्णय

    कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यत्व पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत रद्द केले. न्यायमूर्ती देबांशू बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना रॉय यांना राज्य विधानसभेतून अपात्र ठरवले.

    Read more

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांवर सत्ता सोडण्याची वेळ आणली जाईल; महायुतीत पहिला आघात राष्ट्रवादीवर होईल

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Read more

    Bengaluru Jail : बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये अतिरेकी, हत्येच्या आरोपींना टीव्ही-फोनची सोय; VIP वागणुकीवर भाजपचा सवाल

    बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहाची पुन्हा एकदा चौकशी सुरू आहे. कारागृहातील एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्ना फोन वापरताना दिसत आहे. शकीलवर दहशतवादी संघटना ISIS मध्ये तरुणांना भरती करण्याचा आरोप आहे.

    Read more

    BJP Reject Rahul : भाजपने म्हटले- मतचोरीवर राहुल यांचे दावे खोटे, लपून थायलंड-कंबोडियाला जातात, म्हणतात- अणुबॉम्ब फुटेल, पण तो फुटत का नाही!

    काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत अनियमिततेचा आरोप केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

    Read more

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव म्हणाले- नितीश कुमार निवडणुकीपुरते ‘नवरदेव’; महाराष्ट्राप्रमाणेच खेळी होणार

    सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दरभंगा येथील एका सभेला संबोधित करत होते. नितीश कुमार यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, त्यांना हे देखील माहित आहे की ते आता मुख्यमंत्री होणार नाहीत आणि ते फक्त निवडणुकीतील वर आहेत, म्हणून ते फक्त इतरांना हार घालत आहेत.

    Read more

    Arvind Kejriwal : गुजरातमध्ये आपची किसान महापंचायत; केजरीवाल म्हणाले- पोलिस हटवले तर गुजरातचे शेतकरी भाजपवाल्यांना पळवून-पळवून मारतील

    आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की जर पोलिसांना एका दिवसासाठी हटवले तर गुजरातमधील शेतकरी भाजपवाल्यांना पळवून-पळवून मारतील आणि त्यांचे जीवन दयनीय करतील. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वंतावच गावात “किसान महापंचायत” ला संबोधित करताना केजरीवाल यांनी भाजपवर तीव्र हल्ला चढवला.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या 3 जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या, भाजपने एक जागा जिंकली

    शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) ने तीन जागा जिंकल्या, तर भाजपने एक जागा जिंकली. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच राज्यसभेची निवडणूक होती. काही आमदारांनी केलेल्या क्रॉस-व्होटिंगमुळे भाजपचा विजय शक्य झाला.

    Read more

    Karuna Munde : धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार; करुणा मुंडे यांचा दावा, पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजपचाच हात असल्याचा आरोप

    गत काही वर्षांपासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच तळागाळात जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा संघर्ष मी 2009 ते 2019 पर्यंत पाहिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचाही आरोप केला.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा 96 लाख बोगस मतदारांचा आकडा खोटा, भाजपचा पलटवार; संभाव्य पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा आरोप

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    Navnath Ban : नवनाथ बन म्हणाले- मोदींनी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही; राऊतांची चिखलफेक जनता ओळखून; 96 लाख बोगस मतदारांचा एकही पुरावा नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    Mahesh Kothare : महेश कोठारे म्हणाले- मी मोदीभक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होईल; संजय राऊत म्हणाले – तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल!

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला.

    Read more

    Uday Samant : मंत्री उदय सामंतांचा दावा- रत्नागिरीत राजकीय भूकंपाची चाहूल, उद्धव ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर

    विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंना राहुल, राऊतांचा वाण नाही, पण गुण लागला; 96 लाख खोटे व्होटर असल्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more