Abu Azmi : अबू आझमींचे वारीसंदर्भात वादग्रस्त विधान; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली कानउघाडणी
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. वारीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लीम समाज कधीच तक्रार करत नाही. मात्र जर मुसलमानांनी नमाज पठण केले, तर तक्रार होते, असे विधान अबू आझमी यांनी केले. या याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांच्यावर सडकून टीका केली. अबू प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करतात, मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.