वृत्तसंस्था
मुंबई : कल्याण-डोंबिवली मधील २७ गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी धडपड करणाऱ्या एका तरुणीचा हात मोडला आहे. डोंबिवली पूर्व भागातील भोपर देसले पाड्यातील परिसरा पाणी टंचाई भेडसावत आहे. आता नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा महापालिकेला दिला आहे. Woman’s arm was broken due to water Crises in Dombivali
गेल्या चार महिन्यापासून या इमारतीमधील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात नाही. टँकरला ५०० ते दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहे. पाण्यावर दररोज होणारा खर्च परवडत नाही. पालिका अधिकाऱ्यांनी नवीन पाईपलाईन घेण्याचा सल्ला दिला.
- डोंबिवलीत पाण्यापाई महिलेचा हात मोडला
- चार महिन्यांपासून पाणीप्रश्न बनला जटील
- कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण
- ऐन पावसाळ्यात २७ गावात पाणीबाणी
- आमदार, खासदार यांचे प्रश्नाकडे दुर्लक्ष
- टँकरने पाणी घेणे परवडत नाही