• Download App
    कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कोबीला मिळाला दहा पट जादा भाव, नव्या कृषि कायद्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांंती | The Focus India

    कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कोबीला मिळाला दहा पट जादा भाव, नव्या कृषि कायद्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांंती

    बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव मिळाला आहे. नव्या कृषि कायद्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात अक्षरश: क्रांती झाली आहे. The new agricultural law revolutionized the lives of farmers

    विशेष प्रतिनिधी

    समस्तीपुर : बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव मिळाला आहे. नव्या कृषि कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अक्षरश: क्रांती झाली आहे. The new agricultural law revolutionized the lives of farmers

    शेतकरी आंदोलनाच्याच काळात बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यातील मक्तापूर गावाची कहाणी समोर आली आहे. ओमप्रकाश यादव या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कोबीला कवडीमोल भाव मिळत होता. केवळ एक रुपया किलो भावाने कोबी विकला जात होता. त्यामुळे कोबी शेतातून काढून बाजारात घेऊन जाण्यापेक्षा शेतातच नष्ट करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यामुळे शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवित होते.The new agricultural law revolutionized the lives of farmers

    कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या कानावर हे वृत्त आल्यावर त्यांनी आपल्या विभागातील कॉमन सर्व्हिस सेंटरला आदेश देऊन या शेतकऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांना दुसऱ्या राज्यांत या शेतकऱ्यांचा कोबी विकण्यासाठी मदत करण्यास सांगितले. The new agricultural law revolutionized the lives of farmers

    सरकारने कृषि उत्पादनांच्या विक्रीसाठी डिजीटल व्यासपीठ तयार केले होते. त्यावर याबाबतची माहिती दिल्यावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने दहा रुपये प्रति किलो कोबी खरेदी करण्याच प्रस्ताव दिला. त्यामुळे ओमप्रकाश यादव यांना कोबीला १० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

    रविशंकर प्रसाद यांनी याबाबत सांगितले की, शेतकरी आणि व्यापारी यांच्यात व्यवहार झाल्यवर अर्धे पैसे बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर पोहाचविण्यात आले. या व्यापाऱ्याने कोबी दिल्लीत आणण्यासाठी स्वत: वाहतुकीची व्यवस्था केली आणि उर्वरित अर्धी रक्कमही त्याच्या खात्यात तातडीने जमा केली.

    The new agricultural law revolutionized the lives of farmers

    नव्या कृषि कायद्यामुळेच शेतकऱ्याला हा फायदा मिळाला असल्याचे सांगून रविशंकर प्रसाद म्हणाले, नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला आपला माल देशात कोठेही विकण्याची परवानगी मिळाली आहे. स्थानिक बाजारात भाव मिळाला नाही तर शेतकरी देशात कोठेही आपला माल विकू शकतो.

    Related posts

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!

    पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??