• Download App
    आनेवाडी टोलवर फूड पॅकेटचे वाटप महामार्गावर २०० वाहने अडकलीOn Anewadi toll center food packets Distributed to 200 Driver

    आनेवाडी टोलवर फूड पॅकेटचे वाटप महामार्गावर २०० वाहने अडकली

    वृत्तसंस्था

    सातारा : आनेवाडी टोल नाक्यावर थांबलेल्या २०० हून अधिक वाहनधारकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. महामार्गावर पाणी साचल्याने कोल्हापूर, कर्नाटकाकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली आहे.

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, निपाणी येथील पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबई पुण्याकडून येणारी वाहने साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका खंडाळा, कराड येथे प्रशासनाकडून अडवण्यात आली आहेत.

    आनेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांची संख्या २०० च्या आसपास असून मालवाहतूक तसेच खासगी वाहनचालकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. राज्य वाहतूक संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि भुईंज पोलिसांनी चालकांना फूड पॅकेट वाटप केले.

    सातारा जिल्ह्यात महामार्गावर अडकून राहिलेल्या प्रवाश्यांना जिल्यातील संस्थांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

    •  पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी
    •  कर्नाटक, कोल्हापूरकडे वाहने आनेवाडी टोळवर
    •  वाहनचालकांना आनेवाडी टोलवर फूड पॅकेट वाटप
    •  राज्य वाहतूक संघ आणि भुईंज पोलिसांचा उपक्रम
    •  जिल्ह्यातील संस्थांना सढळ मदतीचे आवाहन

    On Anewadi toll center food packets Distributed to 200 Driver

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नरेंदर – सरेंडर, थंडर – ब्लंडर : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; काँग्रेस – भाजपने मात्र शाब्दिक खेळात अडकवली लढाई!!

    CDS Anil Chauhan : भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली, युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला!!

    Rahul Gandhi and Jairam Ramesh : राहुल गांधी + जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”; पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”!!